शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

Uttar Pradesh Election: भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 6:39 AM

भाजपशी लढताहेत पक्षातीलच गट, भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे.

शरद गुप्ता

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट संकेत दिले की, भाजपकडून चांगली कामगिरी होत नाही. यासाठी समाजवादी पार्टी- राष्ट्रीय लोकदल (सपा-रालोद) युतीची भूमिका कमी स्वत: भाजपमधील अंतर्गत राजकारण जास्त जबाबदार आहे.

भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे. म्हणून गोरखपूरमध्ये ना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मार्ग सोपा आहे ना कौशांबीच्या सिराथू मतदारसंघात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा. भाजपमधील एक गट मौर्य यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सपा युतीच्या पल्लवी पटेल यांना रसद पुरवत आहे तर दुसरा गट गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांच्याविरोधात काम करीत आहे.

मतभेद आणि समन्वयाची टंचाई फक्त राज्यस्तरीय नेत्यांमध्येच आहे असे नाही तर केंद्रीय नेत्यांमध्येही ती आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थकही एक दुसऱ्याच्या विरोधात काम करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात एकाही सभेत भाषण न करण्याचा घेतलेला निर्णयही याच घटनांशी जोडून बघितला जात आहे. खराब हवामानाला दोष देत ते बिजनोरला गेले नाहीत तर, योगी आदित्यनााथ यांचे हेलिकॉप्टर त्याच हवामानात बिजनोरमध्ये उतरले व त्यांनी सभेत भाषणही केले.

१९९९ मधील वातावरणभाजपच्या वरिष्ठ नेत्याने या परिस्थितीचे वर्णन १९९९ मधील लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण आहे, अशा शब्दांत केले. तेव्हा राज्यात भाजपमध्ये कल्याण सिंह, राजनाथ सिंह, कलराज मिश्रा, लालजी टंडन यांच्यासह अनेक गट एकमेकांविरोधात काम करीत होते. त्यामुळे १९९८ मध्ये भाजपने राज्यात ५८ जागा जिंकल्या होत्या त्या १९९९ मध्ये २९ वर आल्या.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी