शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हत्येच्या ७ वर्षानंतर महिला जिवंत परतली; तिच्या हत्येप्रकरणी २ जणांनी भोगली ३ वर्षांची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 15:59 IST

Woman returned alive after 7 years of murder: राजस्थानमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचे मोठे आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील दौसा येथून मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे एका महिलेने पोलिसांना देखील चकित केले. याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण हत्या झालेली महिला तब्बल ७ वर्षानंतर जिवंत सापडली आहे. एवढेच नाही तर या महिलेच्या हत्येप्रकरणी दोन जणांनी जवळपास अडीच ते तीन वर्षे तुरुंगावस देखील भोगला आहे. आता महिला आल्याने सापडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात व्यस्त आहेत. 

उत्तर प्रदेशातील कौशी येथे राहणारी आरती काही वर्षांपूर्वी दौसाच्या मेहदीपूर बालाजीमध्ये राहू लागली होती. इथे ती छोटीमोठी कामे करून उदरनिर्वाह करायची. इथेच तिची भेट सोनू सैनी नावाच्या व्यक्तीशी झाली. दोघांचा संपर्क वाढल्यावर त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले, मग ते एकत्र राहू लागले. लग्नानंतर काही दिवसांनी आरती बेपत्ता झाली होती. आरती बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी वृंदावन येथील कालव्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता.

कपड्यांच्या आधारे वडिलांनी ओळखीचा केला दावासंबंधित मृतदेहाची ओळख पटली नाही तरीदेखील पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर आरतीचे वडील त्या पोलीस ठाण्यात गेले आणि फोटो आणि कपड्याच्या आधारे ती आपली मुलगी आरती असल्याचा दावा केला. त्यानंतर आरतीच्या वडिलांनी २०१५ मध्ये वृंदावन येथील सोनू सैनी आणि दौसा येथील गोपाल सैनी यांच्या विरोधात तिच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता. 

पोलिसांनी राजस्थानमध्ये येऊन दोघांना केली अटक याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलिसांनी दौसा येथे जाऊन आरतीच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले. ते ओरडत राहिले पण पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. नंतर सोनू सैनी आणि गोपाल सैनी सुमारे अडीच ते तीन वर्षे तुरुंगात राहिले आणि नंतर जामिनावर बाहेर आले. जामिनावर बाहेर आल्यानंतर पीडित व्यक्तींनी तपास केला असता दौसा येथील विशाला गावात आरती ही महिला जिवंत आढळून आली.

आरतीला पोलिसांना घेतलं ताब्यात यावर पीडितांनी मेहंदीपूर बालाजी स्टेशन हाऊस ऑफिसर अजित बडसारा यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. पीडितांची कहाणी ऐकल्यानंतर मेहंदीपूर बालाजी पोलिसांनी बैजूपाडा परिसरातून आरती या महिलेला अटक केली आहे. त्यानंतर मेहंदीपूर बालाजी पोलीस ठाण्याने उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलिसांना दौसा येथे बोलावले. दौसा पोलिसांनी आरतीला वृंदावन पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्षणीय बाब म्हणजे तपासात असे समोर आले की, याआधी सोनू सैनीसोबत आरतीने लग्न केले होते, नंतर तिचे लग्न भगवान सिंग रेबारीसोबत झाले.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी