शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
3
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
4
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
5
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट; ७ मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरावस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?
7
बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
8
तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ
9
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
10
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
11
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
12
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
13
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
14
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
15
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
16
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
17
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
18
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
19
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
20
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात

"बाबाच्या सेवेकऱ्याने धक्काबुक्की केली अन्..."; हाथरसमधल्या घटनेची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 1:21 PM

Hathras Stampede Updates : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोक ठार झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तब्बल १२१ भाविकांचा मृत्यू झाला. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याच्या प्रवचनासाठी आलेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेकरी देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दुसरीकडे हाथरसचे उप जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली.

मंगळवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. या कार्यक्रमात दोन ते अडीच लाखाच्या आसपास भाविक आले होते. भोले बाबाचे प्रवचन संपल्यानंतर  त्याचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता भाविकांनी एकच गर्दी जमली. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि १२१ लोकांचा मृत्यू झाली तर अनेकजण जखमी झाले. आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत विस्तृत माहिती दिली.

"सत्संग सुरु असलेल्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजत नारायण साकार हरी (भोले बाबा) सत्संग मंडपात पोहोचले आणि हा कार्यक्रम एक तास चालला. त्यानंतर दुपारी १.४० च्या सुमारास नारायण साकार हरी (भोले बाबा) मंडपामधून बाहेर पडले. महामार्ग-९१ ज्या मार्गाने भोले बाबा बाहेर पडत होते. सत्संगी स्त्रिया/पुरुष/मुले इत्यादींनी त्याच्या पायाची माती घेऊन दर्शनाची खूण म्हणून कपाळावर लावली व चरणस्पर्श करून आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. त्यावेळी बाजूला व मध्यभागी बांधलेल्या दुभाजकावर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी उभे होते. जी.टी.रोड, दुभाजकावरून जेव्हा लोक उड्या मारून बाबाच्या वाहनाकडे धावू लागले. गर्दी बाबांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी आणि सेवेकऱ्यांनी काही लोकांना धक्काबुक्की केली आणि ते खाली पडले. त्यामुळे तो जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि घाबरला. तिथून बाहेर पडण्यासाठी लोकांनी जवळच असलेल्या मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली जिथे अनेक लोक एका उतारावरुन घसरले आणि खाली पडले. इतर लोक त्यांच्या अंगावरुन धावू लागले. यामुळे ते पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत आणि गर्दी त्याच्या अंगावरुन इकडे तिकडे धावू लागली. ज्यामध्ये अनेक महिला, पुरुष आणि मुले जखमी/गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित महसूल व पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना रूग्णवाहिका व इतर माध्यमातून सिरळ येथील घटनास्थळाजवळील रूग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवले. जिथे ८९ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि काही भाविकांना उपचारासाठी एटा जिल्ह्यात पाठवण्यात आले. तिथे २७ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशा प्रकारे, एकूण मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आणि एकूण २३ लोक जखमी झाले," अशी माहिती उपजिल्हाधिकारी सिकंदर राव यांनी दिली. 

दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते. त्यानंतरही आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही असाही सवाल आता केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस