शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 10:21 AM

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी लोक फोन चार्ज होत असतानाच वापरतात आणि झोपताना चार्जिंगवर ठेवतात, जाणे करून तो सकाळी पूर्णपणे चार्ज असावा. पण यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. सहारनपूर जिल्ह्यात मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची दोन मुले होरपळली आहेत.

मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू -एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. त्यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांची पत्नी शहजादी आणि त्यांची दोन मुले कॉटवर पडून मोबाईल बघत होते, यावेळी मोबाईल चार्ज होत होता. शर्मा यांनी सांगितले की, झोप आल्याने शहजादी झोपी गेली. यानंतर, रात्री उशिरा मोबाईल अथवा चार्जरमध्ये करंट आल्याने हा अपघात घडला असावा.

आरडा-ओरड ऐकूण पतीला आली जाग अन्...शर्मा यांनी सांगितले की, या तिघांचा आरडा-ओरड ऐकूण शहजादला जाग आली. तोवर त्याची पत्नी आणि दोन्ही मुले बेशुद्ध झाले होते. यानंतर, तिघांनाही रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी शहजादीला मृत घोषित केले. तर तिची दोन मुले, आरिस (5-वर्ष) आणि सना (8-वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रात्रभर मोबाईल चार्ज करणं धोक्याचं -आपणही रात्रभर मोबाईल चार्ज करत असाल, तर हे तत्काळ थांबवा. कारण यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते. अनेकदा लोक रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून सोडून देतात. मात्र, यामुळे अनेक वेळा मोबाईलचा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. रात्रभर चार्जिंगमुळे मोबाईलचा स्फोट होण्याचीही भीती असते. ओव्हर चार्जिंग मोबाईलसाठी नेहमीच धोकादायक असते. यामुळे बॅटरीची लाइफदेखील कमी होते. 

टॅग्स :MobileमोबाइलelectricityवीजDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश