शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

या राज्यात बाहेरील लोकांना खरेदी करता येणार नाही जमीन, सरकारने घेतला मोठा निर्णय, या कारणानं उचललं कठोर पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:22 IST

Uttarakhand News: एकीकडे महाराष्ट्रात परप्रांतियांच्या येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणण्याची मागणी होत असतानाच तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सक्त जमीन कायद्याला मान्यता दिली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात परप्रांतियांच्या येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणण्याची मागणी होत असतानाच तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सक्त जमीन कायद्याला मान्यता दिली आहे. तसेच या कायद्याचा संशोधित मसुदा हा विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात मांडला जाणार आहे. त्यानंतर बाहेरील लोकांना उत्तराखंडमध्ये शेती आणि हॉर्टिकल्चरसाठी जमीन खरेदी करता येणार नाही. मागच्या दशकभरापासून उत्तराखंडमध्ये शेतजमीन वेगाने वेगळ्या वापरासाठी उपयोगात आणली जात होती. त्यानंतर असा कायदा तयार करण्याची मागणी सुरू झाली होती.

या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार २०१८ मध्ये रावत सरकारने तयार केलेले सर्व भूमी कायदे रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये बाहेरील लोक शेती आणि बागायतीसाठी जमीन खरेदी करू शकणार नाही. हरिद्वार आणि उधमसिंह नगर जिल्ह्यांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला नाही. पर्वतीय परिसरातील जमिनींवर नव्या पद्धतीने चर्चा होईल. तसेच जिल्हा दंडाधिकारी जमीन खरेदीवर शिक्कामोर्तब करू शकणार नाही. तसेच डेटा सुव्यवस्थित उपलब्ध व्हावा यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल तयार केलं जाईल. तसेच जर कुणी नियम मोडून जमीन खरेदी-विक्री केली तर सरकार ती जमीन आपल्या ताब्यात घेऊ शकेल.

स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशमधून विभाजन होऊन वेगळं राज्य बनेपर्यंत उत्तराखंडमध्ये जमीन खरेदीवर  कुठलेही निर्बंध नव्हते. एवढंच नाही तर वेगळं राज्य तयार झाल्यानंतरही यावर कुणी आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे बाहेरील लोकांची या भागात वर्दळ वाढली आणि ते स्वस्तात जमीन खरेदी करून आपल्याला हवा तसा वापर करू लागले. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरील लोक फार्म हाऊस, हॉटेल आणि रिसॉर्ट बांधू लागले. त्यामुळे स्थानिकांना शेतीसाठी जमीन कमी पडू लागली. त्यामधूनच या कायद्याची मागणी होऊ लागली.    

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडGovernmentसरकार