शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

"एक दिवसही..."; अडकलेल्या मजुराने मोदींना सांगितलं अंधाऱ्या बोगद्यात कसे गेले 17 दिवस?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:14 AM

नरेंद्र मोदींनी युवा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडच्या सबा अहमद यांच्याशी चर्चा केली.

उत्तराखंडमधील बोगद्यातून 17 दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या मजुरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधला. नरेंद्र मोदींनी युवा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडच्या सबा अहमद यांच्याशी चर्चा केली. मोदींनी सबा अहमद यांना सांगितलं की, मी माझा फोन स्पीकरवर ठेवला आहे, जेणेकरून माझ्यासोबत बसलेले लोकही तुम्ही काय म्हणताय हे ऐकतील. 

पीएम मोदींनी सबा अहमद यांना सांगितलं की, सर्वात आधी मी तुमचे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. इतक्या संकटानंतरही तुम्हाला बाहेर काढण्यात यश आलं. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. केदारनाथ बाबा आणि भगवान बद्रीनाथ यांच्या कृपेने तुम्ही सर्व सुखरूप आला आहात.

मोदी म्हणाले की, 16-17 दिवसांचा कालावधी कमी नाही. तुम्ही लोकांनी खूप हिंमत दाखवली. एकमेकांची हिंमत वाढवली. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्यात खूप धैर्य होता. मी सतत माहिती घेत होतो. मुख्यमंत्र्यांच्याही सतत संपर्कात होतो. माझे पीएमओ अधिकारी तिथे येऊन बसले होते. सर्व मजुरांच्या कुटुंबीयांचं पुण्य कामाला आलं. ज्यामुळे ते संकटातून बाहेर येऊ शकले.

पंतप्रधानांशी संवाद साधताना सबा अहमद म्हणाले की, "आम्ही इतके दिवस बोगद्यात अडकलो होतो, पण एक दिवसही थोडा अशक्तपणा आणि भीती वाटली नाही. बोगद्याच्या आत आमच्यासोबत असं काहीच घडलं नाही. तेथे 41 लोक होते आणि सर्वजण भावासारखे राहत होते. कुणाला काही झालं तरी आम्ही एकत्र राहायचो. कोणालाही कोणतीही अडचण येऊ दिली नाही."

"जेव्हा जेवण यायचं तेव्हा आम्ही एकत्र बसायचो आणि एकाच ठिकाणी जेवायचो. रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांना फिरायला जायला सांगायो. बोगद्याची लेन अडीच किलोमीटर लांब होती, त्यात आम्ही चालत असू. यानंतर सकाळी सगळ्यांना मॉर्निंग वॉक आणि योगा करायला सांगायचो. यानंतर आम्ही सर्वजण तिथे योगासने करायचो आणि फिरायला जायचो, जेणेकरून प्रत्येकाची तब्येत चांगली राहते."

फोरमॅन गब्बर सिंह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. मोदी म्हणाले की, गब्बर सिंह, मी तुमचे विशेष अभिनंदन करतो. मुख्यमंत्री मला रोज सांगायचे. तुम्ही दोघांनी दाखवलेलं नेतृत्व आणि तुम्ही दाखवलेली सांघिक भावना खूप महत्त्वाची आहे. मोदी म्हणाले की, तुमच्या सर्वांच कुटुंबीय खूप चिंतेत होते. संपूर्ण देशातील 140 कोटी जनता चिंतेत होती. तुमच्या कुटुंबातील सदस्यही अभिनंदनास पात्र आहेत, ज्यांनी अशा कठीण काळात संयम बाळगला आणि पूर्ण सहकार्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttarakhandउत्तराखंड