शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 4:21 PM

Uttarkashi Tunnel Rescue: मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे...

Uttarkashi Tunnel Story:उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सिल्क्यरा बोगदा बचाव मोहिमेत विविध प्रकारचे अडथळे समोर आले, पण बचाव पथकाने ही आव्हाने दूर केली आणि कामगारांना सुखरुप बाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून कामगारांना चिन्यालीसौर येथील तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व कामगारांची प्रकृती ठीक आहे. हे सर्व कामगार 17 दिवस बोगद्यात काय करत होते, त्यांची दैनंदिन दिनचर्या काय होती, ते काय खायचे, शौच्छास कुठे जायचे, अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात असतील. याबद्दल आपण जाणून घेऊ...

दुसरे आयुष्य मिळाले

एखादा व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ आहे, कधीही त्याचा श्वास थांबू शकतो, अशावेळी त्याची मानसिक स्थिती कशी असेल, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. अतिशय कठीण परिस्थितीत हे कामगार मृत्यूशी झूंज देत होते. जगण्याची तीव्र इच्छा आणि कोणीतरी आपल्याला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे, या विश्वासानेच कामगार जगू शकले. झारखंडचे रहिवासी चमरा ओराव सांगतात की, मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी ते फोनवर लुडो खेळायचे, बोगद्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या पाण्यात आंघोळ करायचे. 28 नोव्हेंबर रोजी बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

अशी होती तीनचर्याओराव सांगतात की, 12 नोव्हेंबर रोजी ते बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज आला आणि अचानक माती कोसळू लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ढिगाऱ्यांमुळे तिथेच अडकले. बऱ्याच वेळापासून अडकलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर सर्व कामगारांची अस्वस्थता वाढली. कुणाकडेच खाण्यापिण्याला काही नव्हते. ते फक्त देवाकडे जीव वाचण्यासाठी प्रार्थना करू शकत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एकाही कामगाराने जगण्याची आशा सोडली नाही. 

सुमारे 24 तासांनंतर, म्हणजेच 13 नोव्हेंबरला, कामगारांना पाईपद्वारे भात पाठवला गेला. जेवण मिळाल्यावर कोणीतरी आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्री पटली आणि आमच्या अंगात आनंदाची लाट उसळली. त्यावेळी खात्री पटली की, आता आपला जीव वाचू शकतो. दिवसभर टाईमपास करणं खूप अवघड जात होतं. ज्यांच्याकडे मोबाईल फोन होता, त्यावर लुडो खेळू लागलो. नेटवर्क नसल्याने कुणाशीही बोलता येत नव्हते. आम्ही एकमेकांशी बोलून आमच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करायचो. आंघोळीसाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत होता आणि शौचासाठी जागा बनवली होती. झारखंडचे रहिवासी विजय होरो सांगतात की, आता ते त्यांच्या राज्याबाहेर कुठेही कामासाठी जाणार नाहीत. झारखंडमध्येच मिळेल ती नोकरी करणार. बाहेर राज्यात जाण्याची गरज भासली, तर धोकादायक कामे करणार नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात