शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

'आता शर्टवरही नावं लिहायची का?", युपीतील 'नेमप्लेट' वादावर NDA तील घटक पक्षांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 14:03 IST

केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी या आदेशावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Uttar Pradesh BJP : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने (Yogi Adityanath) कांवड यात्रेच्या (Kanwar Yatra) मार्गांवरील सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकनावर स्वतःचे नाव लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांसोबतच NDA तील मित्रपक्षांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. JDU आणि LJP नंतर आता राष्ट्रीय लोकदलानेही (RLD) या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 

आरएलडी प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी मीडियाशी संवाद साधताना या आदेशावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आता कुठं-कुठं नावं लिहावीत? आता काय आपल्या शर्टवरही नावं लिहायची का? कांवड प्रवाशांची सेवा सर्व जाती-धर्मातील लोक करतात. कांवड यात्रा घेऊन जाणारेही कोणत्या व्यक्तीला त्याची ओळख विचारत नाहीत. हा मुद्दा धर्माशी जोडला जाऊ नये. राज्यातील भाजप सरकारने फार विचार करुन आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे आता सरकार काय निर्ण घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे. सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे," अशी प्रतिक्रिया जयंत चौधरी यांनी दिली. 

काय आहे योगी सरकारचा आदेश?योगी सरकारने कांवड मार्गावरील सर्व दुकानदारांना आपल्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहिण्याचा आदेश जारी केला आहे. आपण कोणाच्या दुकानातून माल घेत आहोत, हे कांवड यात्रेकरुंना कळावे, हा यामागाच उद्देश आहे. सीएमओच्या म्हणण्यानुसार, कांवड यात्रेकरुंच्या श्रद्धेची शुद्धता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या आदेशानंतर कांवड मार्गावरील सर्व दुकानांवर मालकाची नावे दिसत आहे. पण, आता या निर्णयामुळे राज्यातील हिंदू-मुस्लिम राजकारण तापले आहे. विरोधक हा निर्णय राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा