शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Vande Bharat Train Accident:अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:44 IST

Vande Bharat Train Accident:गुरुवारी मुंबईवरुन अहमदाबादला जणाऱ्या वंदे भारत ट्रेनला म्हशी धडकल्यामुळे मोठा अपघात झाल्याची घटना.

Vande Bharat Train Accident: 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील तिसऱ्या 'वंदे भारत ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्याच्या काही दिवसानंतर म्हणजेच, गुरुवारी(दि.6) मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या या हायस्पीड वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train)चा अपघात झाला. रेल्वे रुळावरून घसरली नाही, तर काही म्हशी ट्रेनला धडकल्या. वाटवा आणि मणिनगर स्थानकांजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रेल्वेचा पुढील भाग तुटला. तसेच, या अपघातात 4 म्हशींचा मृत्यूही झाला. 

म्हशींच्या मालकांविरोधात गुन्हाया अपघातानंतर रेल्वे विभागाने एक अजब काम केले आहे. म्हशींच्या मृत्यूमुळे मोठे नुकसान झालेल्या मालकांविरोधात रेल्वे संरक्षण दलाने (RPF) गुन्हा दाखल केला आहे. वाटवा रेल्वे स्टेशनवर तैनात आरपीएफ निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, म्हशींच्या मालकांविरोधात रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 147 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रेल्वेच्या कोणत्याही भागात अनधिकृतपणे प्रवेश करणे आणि त्याच्या मालमत्तेच्या गैरवापराशी संबंधित हा कायदा आहे. अद्याप म्हशींच्या मालकांची ओळख पटलेली नाही.

ट्रेन 20 मिनिटे थांबवावी लागलीअहमदाबाद रेल्वेच्या पीआरओने सांगितले की, सकाळी 11.15 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रेन 20 मिनिटे थांबवावी लागली. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली. रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले की, गावकऱ्यांना त्यांची गुरे ट्रॅकजवळ न सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी 160 किमीपर्यंत वाढविण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करेल.

भारतातील तिसरी वंदे भारत ट्रेनदेशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी आणि नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा दरम्यान धावत आहेत. ही गाडी गांधीनगरहून अहमदाबादमार्गे मुंबईला जाते आणि नंतर या मार्गाने पुन्हा गांधीनगरला येते. विशेष म्हणजे या 'वंदे भारत ट्रेन'ला 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा प्रवासही केला. ही ट्रेन 180 ते 200 किमी/ताशी वेगाने धावू शकते.

आणखी 400 वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारीरेल्वे बोर्ड देशभरात 400 सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी येथे वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सुमारे 1600 डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक डब्याची किंमत 8 कोटी ते 9 कोटी रुपये असेल. त्यामुळे कारखान्यात आवश्यक बदल सुरू झाले आहेत. वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित दरवाजे आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी