शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Vande Mataram and Jana Gana Mana: 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा!; उच्च न्यायालयात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:28 IST

अशी मागणी का करण्यात आली आहे... वाचा सविस्तर

Vande Mataram and Jana Gana Mana: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्'च्या समान प्रचारासाठी धोरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आणि प्रतिवादींना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी मुदत दिली. या याचिकेवर न्यायालयाने नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) कडूनही उत्तर मागितले आहे. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक कामकाजाच्या दिवशी 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्' म्हंटलं जायला हवं, यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारला निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, याचिका सुनावणीसाठी यादीत येण्यापूर्वीच याचिका दाखल केल्याचे प्रसिद्ध केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ही याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यानंतर याचिकाकर्त्याने खेद व्यक्त केल्याचे नमूद करून असे कृत्य पुन्हा करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, या याचिकेवर सुनावणी केली जाईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

का दाखल केली याचिका?

याचिकाकर्त्यांच्या मतानुसार, वंदे मातरम् चा सन्मान केला जायला हवा. वंदे मातरम् कसे म्हणावे याचे कोणतेही नियम किंवा निर्देश नसल्याने काही लोक त्याचे चुकीच्या पद्धतीने गायन करतात. तसेच, चित्रपट आणि इतर कार्यक्रमांमध्ये या गीताचा दुरूपयोग केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या गीताने ऐतिहासिक भूमिका बजावली असून संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० मध्ये केलेल्या विधानाचा विचार करता या गीताला 'जन गण मन' सारखाच आदर-सन्मान दिला जायला हवा.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNational Anthemराष्ट्रगीतCourtन्यायालय