शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

वारेमाप वाळू उपशामुळे जलपातळी घटली गिरणाकाठची गावांमधील स्थिती : बंदी नंतरही दिवसरात्र सुरु आहे वाहतूक

By admin | Published: December 06, 2015 11:51 PM

जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.

जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.

विहिरीची जलपातळी घटली
जिल्हाभरातील २८ ग्रामपंचायतींनी वाळू उपशास नकार दिला आहे. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे तेथील पाणी पातळीत घट झाली आहे. या भागातील विहिरींचे जलस्त्रोत कमी होण्याचे प्रकार वाढले आहे. त्याचा फटका हा आजूबाजूच्या गावातील सिंचनावर होत आहे. पाण्याअभावी या भागातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम
गिरणा नदीच्या काठी अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदून त्या ठिकाणावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकल्या आहेत. गिरणा नदी काठावर असलेल्या या विहिरींना बारा महिने पाणी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई फारशी या गावांना भासत नव्हती. मात्र वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील विहिरीची जलपातळी घटल्याने त्याचा फटका हा पाणीपुरवठा यंत्रणेवर होत आहे. त्याचा परिणाम म्हणून शिरसोलीसह अनेक गावांमध्ये आजही सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

तापी नदी पात्राकडे वळविला मोर्चा
जिल्हा प्रशासनाने वाळूच्या ४४ गटांसाठी लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आजही गिरणा काठच्या आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, बांभोरी, दापोरा, कुवारखेडे, नागझिरी, धानोरा बुद्रुक गावांमधून मोठ्या प्रमाणात अवैध स्वरुपाचा वाळूचा उपसा सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळूचा उपसा झाल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक असलेली चांगल्या प्रतीच्या वाळूचा साठा हा कमी होत असल्याने वाळू उचल करणार्‍या धुळे, नाशिक, मालेगाव येथील व्यावसायीकांनी अन्य जिल्ह्यातील तापी नदीकडे आपला मोर्चा वळविला आहे.