शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:45 IST

Varun Gandhi speech in Maneka Gandhi: वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, पंतप्रधान मोदी यांचा नावाचा साधा उल्लेखही नव्हता

Varun Gandhi speech in Maneka Gandhi Election Campaign: भाजपाचे पिलीभीतचे माजी खासदार वरुण गांधी यांचे या निवडणुकीला तिकीट कापण्यात आले. केंद्र सरकारच्या काही निर्णयांवर आणि योजनांवर टीका केल्याने पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकींचे पाच टप्पे पूर्ण झाले, तसेच मनेका गांधी यांचा सुलतानपूरमध्ये प्रचार सुरु झाला, पण वरुण गांधी कुठेही दिसत नव्हते. मनेका गांधी यांनी नुकतेच एका सभेत सांगितले होते की २३ मे पासून वरुण गांधी प्रचाराला सुरुवात करतील. त्यानुसार, अखेर आजपासून वरुण गांधी प्रचारप्रक्रियेत 'अ‍ॅक्टिव्ह' झाल्याचे दिसले. आपल्या मातोश्री मनेका गांधी यांच्या प्रचारसभेत बोलताना वरुण गांधींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा अजिबात उल्लेख केला नाही.

वरुण गांधी यांनी आज सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांच्यासाठी मते मागितली. वरुण म्हणाले, "देशभर निवडणुका होत आहेत पण देशात केवळ हे एकच मतदारसंघ क्षेत्र असे आहे की जिथे त्यांच्या नेत्याला कोणीही खासदार किंवा मंत्रीजी म्हणत नाहीत, तर लोक त्यांना माता जी म्हणतात." आई कधीच आपल्याला मुलाची साथ सोडत नाही. म्हणूनच आज मी केवळ माझ्या आईसाठी नव्हे तर संबंध सुलतानपूरच्या माताजींसाठी तुमचा जनाधार मागण्यासाठी आलो आहे. मी पहिल्यांदा सुलतानपूरला आलो तेव्हा मला इथे पित्यासारखं प्रेम मिळालं. पण आता मला इथल्या मातीत आईसारखी माया मिळते हे मी हक्काने सांगू शकतो. कारण आज सुलतानपूर हे मनेका गांधी या नावाने ओळखले जाते."

"जेव्हा इथले लोक बाहेर जातात आणि सुलतानपूरचे नाव सांगतात तेव्हा लोक विचारतात की, मनेका गांधी वाले सुल्तानपूर का? सुलतानपूरला एका खासदाराची गरज आहे जो जनतेला आपले कुटुंब समजतो. पिलीभीतमध्ये ज्याप्रमाणे वरुण गांधींचा नंबर प्रत्येकाकडे आहे, त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्ये माझी आई रात्रीबेरात्री फोन उचलते आणि सर्वांना मदत करते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मनेका गांधी यांनाच मोठ्या संख्येने मतदान करा," असे तो म्हणाला.

वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, मोदींचा उल्लेखही नाही!

वरुण गांधी सभेला आले तेव्हा त्यांनी भाजपाचा गमछा घालणे टाळले. त्यांनी गळ्याभोवती गुंडाळलेल्या गमछावर 'राधे राधे' असे शब्द लिहिले होते. तसेच वरुण गांधी यांनी भाषणादरम्यान एकदाही पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त त्यांचे वडील, त्यांची आई मनेका गांधी आणि विकासकामे यांचाच उल्लेख केला. या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी यांचे तिकीट भारतीय जनता पक्षाने रद्द केले. त्यांच्या जागी भाजपने काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबतचा रोष वरुण यांच्या भाषणातून स्पष्ट दिसून आला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Varun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीsultanpur-pcसुल्तानपुरBJPभाजपा