शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब

By गौरीशंकर घाळे | Updated: February 21, 2022 05:44 IST

चारही मतदारसंघांतील राजकीय लढाई तीव्र 

गौरीशंकर घाळे

पिलिभित : रामायण आणि महाभारताचे संदर्भ उत्तर प्रदेशात पावलोपावली मिळत जातात. राजधानी लखनऊला खेटून असलेल्या उन्नाव जिल्ह्याला रामायणाचा संदर्भ आहे. तर, उत्तरेचे पिलिभित श्रीकृष्णाच्या बासरीसाठी प्रसिद्ध आहे. याच पिलिभितमधून एकेकाळी वरूण गांधी यांनी हिंदुत्वाचा राग आळवला होता. पण, सध्याच्या भाजप नेतृत्वाशी त्यांचे सूर फारसे जुळत नाहीत. पिलिभितमधील चारही विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढाई तीव्र झाली असताना खासदार असलेले वरूण गांधी मात्र सध्या गायब आहेत. 

पिलिभित जिल्ह्यातील चारही जागा २०१७ साली भाजपच्या खात्यात जमा झाल्या. पिलिभित, बरखेडा, पुरनपूर आणि बिसलपूर हे ते चार मतदारसंघ. यावेळी इथली राजकीय लढाई तीव्र बनली आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांनी इथे प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या सभा झाल्या. तर, जिल्ह्याच्या राजकारणाची नस ओळखून असलेले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच इथे फेऱ्या वाढवल्या होत्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांची सभा आणि पाठोपाठ रोड शो असणार आहे. दुसरीकडे, भाजपचा गड भेदण्यासाठी सपाचे अखिलेश यादवही पिलिभितची वारी करून गेले आहेत. भाजप आणि समाजवादीने चारही जागांवर सगळा जोर लावला आहे. 

पिलिभत विधानसभेचा शहरी भाग वगळता इतर तीन मतदारसंघांचा तोंडवळा ग्रामीण आहे. या भागातून शेतकरी आंदोलनाला चांगलाच पाठिंबा मिळाला होता. जोडीला मोकाट जनावरांची समस्याही स्थानिकांची डोकेदुखी बनली आहे. पण, त्यामुळे वातावरण थेट भाजपच्या विरोधात गेले, असे मात्र नाही. शेतकरी, कामगार वर्गासाठी राज्य सरकारची पेन्शन योजना आणि राशन वितरण भाजपची जमेची बाजू बनली आहे. स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही राज्याच्या योजनांसह केंद्रीय योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जंत्री मांडली होती. सपाचा वाढत्या प्रभावाला लाभार्थीच बांध घालतील अशी भाजपला आशा आहे.

सपाचे होते वर्चस्व  या मतदारसंघातून २०१७ पूर्वी सपाचे नेते आणि माजी मंत्री रियाज अहमद तीनवेळा आमदार होते. त्या काळातील सपाचे वर्चस्व पुन्हा नको, असाही एक अंतरप्रवाह जिल्ह्यातून वाहतो आहे. रियाज आज या जगात नाहीत, त्यांचा मुलगा बसपाच्या तिकिटावरून लढतो आहे. तरीही उलटा परिणाम सपाला त्रासदायक बनतो आहे.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२