शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

UP Assembly Election 2022: रात्री कर्फ्यू अन् सकाळी रॅलीसाठी लाखोंची गर्दी बोलवायची हे कुठले निर्बंध?, वरुण गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:56 IST

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपानं प्रचाराचा धुरळा उडवला आहे आणि मोठ्या प्रमाणात जनसभा आयोजित करण्याचा धडाका लावला आहे.

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपानं प्रचाराचा धुरळा उडवला आहे आणि मोठ्या प्रमाणात जनसभा आयोजित करण्याचा धडाका लावला आहे. निवडणुकीसाठी आपली ताकद दाखवण्यासाठी उत्तर प्रदेशात प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राजकीय सभेला लोकांची गर्दी होईल याची काळजी घेताना दिसत आहे. पण एका बाजूला देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. रात्री कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला जात आहे. पण सकाळी राजरोसपणे कोविड निर्बंधांच्या प्रोटोकॉलचा उल्लंघन केलं जात आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं कोरोना निर्बंध आणखी कडक करत राज्यात नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. पण याच मुद्द्यावर भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीच निशाणा साधला आहे. 

"रात्री कर्फ्यू लावायचा आणि दिवसा निवडणूक रॅलींसाठी लाखो लोकांची गर्दी बोलवायची हे तर समजण्यापलिकडे गेलं आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य सेवेची मर्यादा लक्षात घेऊन आता आपल्याला अतिशय प्रमाणिकपणे ओमायक्रॉनचा धोका रोखणं महत्त्वाचं आहे की राजकीय सभांना शक्तीप्रदर्शन करणं अधिक महत्त्वाचं आहे हे ठरवावं लागेल. आपल्याला प्राथमिकता निश्चित करावी लागेल", असं ट्विट वरुण गांधी यांनी केलं आहे. 

अलहाबाद हायकोर्टानं नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉनच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात रॅली आणि रोड शोवर बंदी लावण्याबाबतचं आवाहन केलं होतं. शक्य असल्याचं निवडणूक पुढे ढकलण्याचाही सल्ला हायकोर्टानं दिला आहे. 

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश