शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:24 IST

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती.

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसापूर्वी या राज्यांचा एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काटावर चक्कर असल्याचे दाखवले होते, यामुळे आता सर्वच पक्षांनी अपक्ष आणि बंडखोर आमदारांसोबत संपर्क वाढवला आहे. राजस्थानमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत असून आता वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये आल्या असल्याचे बोलले जात आहे. 

गहलोत यांच्यानंतर वसुंधरा राजेंनीही घेतली राज्यपालांची भेट; निकालांआधी हालचाली वाढल्या

एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा काटावर आघाडी असल्याचे दाखवले आहे.आता दोन्ही पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. वसुंधरा राजे यांनी स्वत: भाजपची आघाडी हाती घेतली आहे, तर अशोक गेहलोत काँग्रेसकडून रिंगणात आहेत. दोन्ही नेते अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांशी संपर्क साधत आहेत. त्रिशंकू झाल्यास बहुमताचे आकडे करण्यासाठी या आमदारांचा वापर होऊ शकतो.  वसुंधरा राजे सिंधिया यांनी शुक्रवारी सांचोरचे माजी आमदार आणि यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे जीवराम चौधरी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीवराम चौधरी यांनी वसुंधरा यांना विजयाचे प्रमाणपत्र घेऊन जयपूरला येत असल्याचे सांगितले. जालोरच्या सांचोर विधानसभा मतदारसंघातून भाजपविरोधात बंडखोरी केलेले जीवराम चौधरी यांनी सलग दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. 

सांचोरमध्ये जीवराम यांची थेट स्पर्धा काँग्रेसच्या सुखराम विश्नोई यांच्याशी आहे. "दोन दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांचाही फोन आला होता",असे ते म्हणाले. जीवराम चौधरी यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही फोन आल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. गेहलोत यांनी जीवराम यांना जयपूर येथे भेटण्यास सांगितले होते. याबाबत जीवराम चौधरी यांना विचारले असता ३ डिसेंबरलाच आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले. सांचोरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि नर्मदेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे जीवराम चौधरी मजबूत दिसत आहेत, त्यामुळे जयपूरमधून त्यांना मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचे फोन येत आहेत.

काँग्रेस, भाजप बंडखोरांशी संपर्कात

बारमेर जिल्ह्यात पक्षाच्या नेत्यांनी भाजप बंडखोर रवींद्र सिंह भाटी आणि प्रियंका चौधरी यांच्याशी संपर्क साधला आहे. या दोघांशीही काँग्रेसने संपर्क साधला आहे. काँग्रेसच्या आणखी दोन बंडखोरांवरही भाजपची नजर आहे. रवींद्र भाटी आणि प्रियंका चौधरी यांनी सांगितले की, त्यांना भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे फोन येत आहेत. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक