शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

भाज्या, दुधात कीटकनाशके

By admin | Published: October 03, 2015 3:56 AM

सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे.

नवी दिल्ली : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे. तपासणी झालेल्या २०,६१८ नमुन्यांपैकी १२.५ टक्के नमुन्यांत कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीवर असल्याचे उघड झाले आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती व उत्पादनात आरोग्यवर्धक घटकांची मात्रा, रसायने अथवा कीटकनाशके यांची मात्र तपासण्यासाठी २००५ पासून सरकारतर्फे विविध खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होत आहे. या तपासणीकरिता देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून सरसकट भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व अन्य खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले जातात व देशभरातील २५ प्रयोगशाळांतून या पदार्थांचा दर्जा व त्यातील रसायने यांची तपासणी केली जाते. त्यावेळी या पदार्थांत कीटकनाशकांची मात्रा अधिक असल्याचे आढळून आले. जमा केलेल्या भाज्यांच्या ११८०, फळांच्या २२५, मसाल्याच्या ७३२, तांदळाच्या ३०, डाळीच्या ४३ नमुन्यांत अशी धोकादायक कीटकनाशके सापडली. भाज्यांमध्ये अ‍ॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ ही कीटकनाशके सापडली. फळांमध्ये अ‍ॅसिफेट, अ‍ॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस आदी सापडले.बंदी असलेल्या अनेक कीटकनाशकांचाही वापर असल्याचे दिसून आले आहे. या नमुन्यात अ‍ॅसिफेट, बाइफ्रेंथिन, अ‍ॅसिटामीप्रेड, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ, मेलेथियन, कार्बो सल्फान, प्रोफेनोफेस, एक्साकोनाजेन आदींचे अंश सापडले. या रसायनांची अतिरिक्त मात्रा शरीरासाठी हानिकारक आहे. तर कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे, की सुमारे ५४३ नमुन्यांत २.६ टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.