शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

''‘वाहन’ विधेयकामुळे राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:08 IST

वाहन अधिनियम विधेयक गेल्या पाच वर्षांपासून संसदेत मंजूर करवून घेता आले नाही, अशी खंत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली : माझ्या विभागाने अनेक प्रयत्न केलेत; परंतु वाहन अधिनियम विधेयक गेल्या पाच वर्षांपासून संसदेत मंजूर करवून घेता आले नाही, अशी खंत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मी स्वत: अपघातग्रस्त होतो. पाय चार ठिकाणी मोडला होता. माझी वेदना समजून घ्या. सर्वांच्या आक्षेपांना मी उत्तर देईन. या विधेयकामुळे राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप होणार नाही, लोकहितासाठी यास सहकार्य करा, अशी कळकळीची विनंती गडकरी यांनी लोकसभेत केली.वाहन अधिनियम विधेयक स्थायी समिती, संयुक्त समितीकडून काही सुधारणांसह पुन्हा लोकसभेत मांडण्यात आले. त्यावेळी गडकरी यांनी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. ते म्हणाले, हे विधेयक १८ राज्यांच्या परिवहन मंत्र्यांनी तपासले. त्यानंतर संसदेत मांडले. दोन्ही सदनांनी स्थायी समिती व संयुक्त समितीकडे ते पाठवले. दोन्ही समित्यांच्या अहवालानातंर राज्यसभेत मांडले. तेथे नामंजूर झाले. राज्याच्या हक्कावर गदा आणण्याचा आक्षेप चुकीचा आहे.हा विषय संयुक्त सूचीतला असल्याने त्यात बदलाचा अधिकार केंद्र व राज्यालाही असल्याचे नमूद करुन राज्यांवर अंमलबजावणीची सक्ती नसल्याचा पुनरुच्चार गडकरी यांनी केला. नवे वाहन खरेदी केल्यावर आरटीओ कार्यालयात नेण्याऐवजी डिलरनेच नोंदणी करावी. आरटीओला थेट पेसे मिळतील. आक्षेपांवर चर्चा करावी. एकतर माझी समजूत घाला किंवा माझ्याकडून समजून घ्या, असे भावनिक आवाहनही गडकरी यांनी केले.>काय म्हणाले गडकरी?दरवर्षी अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू तर पाच लाख जखमी होतात. एकाच व्यक्तीला दिल्ली, जयपूर, मुंबईतही वाहन परवाना मिळतो. कारण जगात केवळ भारतातच परवाना सर्वात सोप्या पद्धतीने मिळते. लोकांमध्ये कायद्याविषयी सन्मान, भीती नाही. लोक दंडाला घाबरत नाहीत. पाच वर्षांत साडेतीन चार टक्के अपघात कमी झालेत.तामिळनाडूने प्रयोग करुन १५ टक्क्यांपर्यंत अपघात कमी केले. हा राजकीय मुद्दा नाही. लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.>तरतुदीरस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदतनिधी देण्याची तरतूद नव्या वाहन अधिनियम कायद्यात करण्यात आली आहे.जखमींना अडीच लाख रुपये मदत द्यावी लागेल. दिव्यांगांना वाहन परवाना. दळणवळण परवाना नूतनीकरण तीनऐवजी पाच वर्षांनी करण्याचाही प्रस्ताव आहे. चालक परवान्याची मुदत संपण्याआधी व नंतर वर्षभराची मुदत नूतनीकरणासाठी देण्यात येणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी