शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

कर्नाटकातील वाद मिटविण्यासाठी वेणुगोपाल यांची शिष्टाई; सरकार टिकविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:30 IST

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली.

बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा त्यात काही बदल होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, आघाडीतील दोन्ही पक्षांतील कुरबुरीही वाढल्या आहेत.वेणुगोपाल मंगळवारी रात्री बंगळुरूमध्ये दाखल झाले. कुमारस्वामी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांची त्यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यानंतर, कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये काँग्रेस आमदारांनी कुमारस्वामी यांच्या कारभाराबद्दल वेणुगोपाल यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजते. राज्यातील काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कुमारस्वामींबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कुमारस्वामी मंत्रिमंडळात सध्या जनता दलाच्या वाट्याच्या दोन व काँग्रेसची एक अशा तीन जागा रिकाम्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात त्या भरून काढण्याचे गाजर दोन्ही पक्षांतील आमदारांना त्यांच्या नेत्यांनी दाखविले होते, पण अद्याप तसा निर्णय होत नसल्याने काँग्रेसच्या आमदारांत असंतोष पसरला आहे. कुमारस्वामींच्या ३४ जणांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काँग्रेसचे २२ व जनता दलाचे १२ मंत्री आहेत. कुमारस्वामींचे सरकार केव्हाही कोसळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटक