शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

1962 आणि 2017 मध्ये खूप फरक ! भारताचे चीनला प्रत्युत्तर

By admin | Published: June 30, 2017 4:31 PM

सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी आपल्या सीमेत घुसखोरी केल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. तसेच चीनला दिलेल्या विस्तारित प्रत्युत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चुंबी घाटी परिसरातील तिबेटचा भूभाग असलेल्या डोकलममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करून रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही युद्धाची धमकी देणाऱ्या चीनला कडक शब्दात उत्तर देताना 1962 आणि 2017 मध्ये खूप फरक असल्याचे सांगितले.  दरम्यान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर  भारताने नथूला खिंडीतून होणारी मानसरोवर यात्रा रद्द केली आहे. चीनने तणाव वाढल्यावर भारतीय यात्रेकरूंना सीमेवर रोखले होते.  
भारताने सिक्कीमच्या सीमेवरील तणाव आणि चीनकडून येत असलेल्या आक्रमक वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून आक्रमक पवित्रा घेत आपल्या शेजाऱ्याला त्याच्याच शब्दात उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 11 मुद्यांवर आधारित प्रत्युत्तर देत भारतीय जवानंवर घुसखोरीचे आरोप करणाऱ्या चीनच्या कांगाव्याचे पितळ उघडे पाडले आहे. चीनचा खोटारडेपणा उघड करताना भारताने सांगितले की, 16 जून रोजी पीएलएचे पथक डोकलम परिसरात रस्ता बनवण्यासाठी घुसले होते. मात्र रॉयल भूतान आर्मीने चिनी लष्कराला असे करण्यापासून रोखले. तसेच भूतान सरकारच्या राजदूतानेही आपण दिल्लीतील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून चिनी सरकारकडे आपला विरोध व्यक्त केल्याचे स्पष्टपणे सांगितले.  
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात चीनला कठोर शब्दाच उत्तर दिले आहे.  चीन विस्तारवादी भूमिकेतून दुसऱ्या देशांच्या भूभागांवर कब्जा करत आहे. भारत आणि भूतानमध्ये संरक्षणविषयक करार झालेला आहे. त्यामुळे भारताला चीनच्या विस्तारवादाची चिंता लागणे साहजिकच आहे.  तसेच 1962 आणि 2017 यामध्ये खूप फरक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.