शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

गायींच्या रक्षणासाठी तलवारी घ्या हातात; विहिंपच्या नेत्या साध्वी सरस्वतींचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 3:05 PM

VHP leader Sadhvi Saraswati : "माझा जन्म झाला तेव्हापासून माझ्याकडे दोन संकल्प होते. एक म्हणजे प्रभू रामाचे मंदिर बांधणे आणि दुसरे म्हणजे भारतात गोहत्या बंद करणे"

नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती (VHP leader Sadhvi Saraswati) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "लोक एक लाखाचा मोबाईल खरेदी करू शकतात तर मग एक हजाराची तलवार का नाही?, गाय़ीच्या रक्षणासाठी आता लोकांनी तलवारी हातात घ्याव्यात" असं विधान साध्वी सरस्वती यांनी केलं आहे. तसेच "ज्या दिवसापासून माझा जन्म झाला तेव्हापासून माझ्याकडे दोन संकल्प होते. एक म्हणजे प्रभू रामाचे मंदिर बांधणे आणि दुसरे म्हणजे भारतात गोहत्या बंद करणे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. 

फोनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी लोकांनी गायींच्या संरक्षणासाठी तलवारी आणि शस्त्रे खरेदी केली पाहिजेत असं म्हटलं आहे. तसेच "जर लोकांना एक लाखाचा फोन विकत घेणे परवडत असेल तर ते आपल्या गायींच्या रक्षणासाठी नक्कीच तलवार खरेदी करू शकतात आणि घरात ठेवू शकतात. तलवारीच्या खरेदीमुळे लोक त्यांच्या देवी मातेचे (गायीचे) गोहत्येपासून संरक्षण करतील. आपला जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे हे माझे कर्तव्य आहे" असं साध्वी सरस्वती यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत केलं दफन; परिसरात एकच खळबळ

उत्तर प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत दफन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील नरैनी नगर पंचायत येथील मोतियारी बाजारातील गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करून अधिकाऱ्याचं (EO) निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नरैनी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार राज करण कबीर यांनी या प्रकरणातील मुख्य दोषींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करत येथी EO यांचं निलंबन केलं आहे.

मुख्य विकास अधिकारी वेद प्रकाश मोर्य यांच्या रिपोर्टनुसार तब्बल 50 गायींना जिवंत दफन करण्याच्या या प्रकरणात इओ प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपा आमदार राज करण कबीर यांनी सांगितलं की, छोट्या अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पहाडी खेरा जंगलात 50 हून अधिक गायींना जिवंत दफन करण्यात आलं होतं. यामध्ये उपजिल्हाधिकारी नरैनीदेखील सामील होते असा आरोप केला आहे. कबीर यांनी मुख्य विकास अधिकारीच्या तपासावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच या घटनेचा तपास केला जात आहे.  

टॅग्स :cowगाय