शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Video: विंग कमांडर अभिनंदन यांना मार्गदर्शन करत होती 'ही' रणरागिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:07 IST

विंग कमांडर अभिनंदन यांना आज वीरचक्र प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर पुलवामामध्ये केलेला भ्याड हल्ला, यानंतर भारताने बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले होते. याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने अमेरिकेच्या एफ 16 विमानांसह लढाऊ विमाने पाठविली होती. मात्र, त्या विमानांना पळवून लावत असताना एफ 16 पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पडल्याने पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आले होते. अभिनंदन यांना अचूक मार्गदर्शन करणारी रणरागिणी आज समोर आली आहे. 

विंग कमांडर अभिनंदन यांना आज वीरचक्र प्रदान करण्यात आले. नाट्यमय घडामोडींनंतर अभिनंदन भारतात परतले होते. या अभियानावेळची कंट्रोल रूम मधली परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनी या निमित्त सांगितली आहे. मिंटी अग्रवाल यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले. 

आमची हवाई दलाची टीम 26 जुलैला बालाकोटवर हवाई हल्ला करून यशस्वीरित्या माघारी परतली होती. आमच्याकडे हवाई सीमेचे रक्षण करण्यासाठी कमी विमाने होती. ते (पाकिस्तानी) भारतात विध्वंस करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने घुसले होते. मात्र, आमच्या पायलटनी धाडस दाखविल्याने त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, असे अग्रवाल म्हणाल्या. 

अटीतटीच्या क्षणांवेळी अभिनंदन यांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एफ-16 पाडले. तेव्हाची परिस्थीती युद्धाची होती. त्यांची विमाने मोठ्या संख्येने होती आणि आमच्या लढाऊ विमानांनी त्यांना कडवी झुंज दिली. 26 आणि 27 तारखेच्या लढाईमध्ये मी देखील सहभागी होते. अभिनंदन यांच्यासोबत दोन्ही बाजुने संभाषण करत होते. जेव्हा त्यांचे विमान हवेत होते, तेव्हा त्यांना दुष्मनाच्या विमानांचा अचूक ठावठिकाणा कळवत होते. अभिनंदन यांना आसपासच्या परिस्थितीचे माझ्याकडून योग्य मार्गदर्शन झाल्याने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडता आल्याचे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान