शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

VIDEO: काश्मीरमध्ये जवानांना भररस्त्यात मारहाण, पाहून तुमचंही रक्त उसळेल

By admin | Published: April 12, 2017 7:14 PM

श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे दहशतवाद्यांना सामोरं जावं लागत असताना ज्यांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र पहारा देत असतात त्यांच्याकडूनच जवानांना गैरवर्तवणूक मिळत असल्याचं समोर आलं आहे. श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडतानाचा तसंच मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जवानांना मिळणारी वागणूक पाहता भारतीयांचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावून लढतो तोच आपल्यावर उलटणार असेल तर मग आपला नेमका शत्रू कोण असा प्रश्न जवानांना पडत असेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला होता. या व्हिडीओत हे जवान मतदान केंद्रावरुन परतत असल्याचं दिसत आहे. यावेळी हे जवान एव्हीएम घेऊन परतत असताना काही तरुण या जवानांवर हल्ला करत हाताने, पायाने मारहाण करत आहेत. तसंच यावेळी विरोधात घोषणाही दिल्या जात असल्याचं ऐकू येत आहे. एका तरुणाने तर जवानाचं हेल्मेटही फेकून दिलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 
 
हे सर्व होत असताना भारतीय जवान जे पुर्णपणे सशस्त्र आहेत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चालत राहणं पसंत केलं. आपल्याकडे असलेले एव्हीएम सुरक्षितपणे पोहोचवणे हा आपला मुख्य हेतू असल्याने इतर कोणत्याही गोष्टीकडे जवानांनी लक्ष दिलं नाही. याउलट त्यांनी हे सर्व संयमणे सहन केलं.  
 

"सध्या जवानांवर पेलेट गनचा वापर केला जात असल्याने वारंवार टीका केली जात आहे. मात्र हा व्हिडीओ लोकांनीच काढला असून त्यांनीच अपलोड केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक होत असल्याचं स्पष्ट दिसत असून जवानांनी प्रतिक्रिया दिलेली नाही", असं सीआरपीएफचे प्रवक्ते भवनेश कुमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. 
 
"जवानांनी एव्हीएमच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी ज्याप्रकारचा संयम दाखवला आहे तो कौतुकास्पद आहे. लोकशाही जिवंत ठेवणे त्यांची प्राथमिकता होती", असंही ते बोलले आहेत. "या व्हिडीओतून जवानांचा संयम दिसतो", असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर बोलले आहेत. 
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला. अनेक मतदार संघांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलाने विविध भागांमध्ये केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत. या हिंसाचारामुळे केवळ ६.५ टक्के मतदान झाले आहे.
 
बडगाम जिल्ह्यात चरार ए शरीफच्या पाखेरपुरा आणि बीरवाह भागात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यात चडूरा भागात एक जणाचा, तर मागम भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तणावामुळे तब्बल ७० टक्के मतदान केंद्रांवरील कर्मचारी निघून गेले. या हिंसाचारामध्ये ७० ते १०० जवान जखमी झाल्याचे समजते.