शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:40 IST

मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. 

कटिहार - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. नेत्यांच्या भाषणबाजीकडे निवडणूक आयोगाचाही करडी नजर आहे. मायावती यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केलेलं विधान कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएमसारखी पार्टी अस्तित्त्वात आली आहे. मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. 

कटिहार लोकसभा मतदारसंघातील बलरामपुर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेला नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याकांची लोकसंख्या जास्त असल्याने मुस्लिम मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तारीक अन्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जर मुस्लिमांनी एकत्र येत एकगठ्ठा काँग्रेसला मतदान केलं तर तारीक अन्वर यांना कोणी हरवू शकत नाही असा दावा नवजोत सिंग सिद्धू यांनी केला आहे. 

या प्रचारसभेत बोलताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, याठिकाणी लोकांना जातीपातीत  भांडून राजकारण केलं जात आहे. या मतदारसंघात मुस्लिमांनी अल्पसंख्याक बनून राहू नका, बहुसंख्यांक बना. या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे मतदान ६२ टक्के आहे. जर भाजपावाले तुमच्या मतांमध्ये फूट पाडत असतील तर तुम्ही सगळे एकजूट दाखवा, जर असं झालं तर काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही असं नवजोत सिंग यांनी सांगितले. 

त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर निशाना साधत नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांचा उल्लेख फेकू असा केला. याआधीही बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनीही मुस्लिमांबाबत असं विधान केलं होतं. ज्यामुळे मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ४८ तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. 

मायावती यांनी देवबंद येथे मुस्लिम समुदायाला एकत्र राहण्याचं आवाहन करत सपा-बसपाला मतदान करा असं वक्तव्य केलं होतं. आचारसंहितेच्या नियमांनुसार देशातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अथवा पक्षाने धर्म आणि जातीच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन करु शकत नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूMuslimमुस्लीमVotingमतदानBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019katihar-pcकटिहार