शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अटकेनंतर काही तासांतच विजय माल्याची सुटका

By admin | Published: April 18, 2017 3:35 PM

किंगफिशर एअरलाइन्सच्या विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र काही तासांतच त्याला जामीन मंजूर

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 18 - हजारो कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी भारताला हव्या असलेल्या  किंगफिशर एअरलाइन्सच्या विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र त्याला लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. माल्याकडे भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्ज थकित आहे. तसेच त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गंभीर स्वरूपाचे आर्थिक गुन्हे दाखल झालेले आहेत.  

माल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून अटक केली. अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याच्या भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण माल्याला वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असता तेथे कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर  "माझ्या अटकेचे भारतातील प्रसारमाध्यमांनी अवास्तव वृत्तांकन केले. प्रत्यार्पणाच्या खटल्याची आज सुनावणी सुरू झाली आहे," असे ट्विट करत माल्याने प्रसारमाध्यमांवर टीका केली.  

माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 9 फेब्रुवारी रोजी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. "माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे", अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी केली होती.

विजय माल्याची बुडीत निघालेली कंपनी किंगफिशर एअरलाइन्सकडे नऊ हजार कोटींचे कर्ज थकले होते. एसबीआयच्या नेतृत्वाखालील 17 विविध बँकांनी माल्याला हे कर्ज दिले होते. कंपनी डबघाईस येऊन कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्यावर माल्या इंग्लंडमध्ये पसार झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने माल्याला पासपोर्टसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र माल्या न्यायालयात हजर राहिला नव्हता.

( विजय माल्याच्या "किंगफिशर व्हिला"ची अखेर विक्री)  

भारताने केली होती प्रत्यार्पणाची मागणी दरम्यान, यावर्षी फेब्रुबारी महिन्यात भारत-ब्रिटन प्रत्यार्पण करारांतर्गत माल्याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने ब्रिटनकडे  केली होती. त्यासाठी  वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ब्रिटन दौरा करून तेथील संबंधितांशी चर्चा केली होती. 

( कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा )

 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता माल्याचा पासपोर्ट
बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय माल्या देशाबाहेर पसार झाला होता. यानंतर माल्याची देशवापसी करण्यासाठी केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केले. विजय माल्याचा पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आला होता.  तीनवेळा समन्स बजावूनही विजय माल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळवले.  माल्यावर मायदेशी परतण्याचा दबाव निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.  
 
( विजय माल्याकडे आहेत फक्त 16,440 रुपये )
 
 
 न्यायालयाने केले होते विजय माल्याला फरार घोषित
मुंबईतील विशेष न्यायालयाने माल्याला फरार म्हणून घोषित केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला होता.  
विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात करत आयडीबीयच्या  900 कोटीं कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने त्याची 1411 कोटींची मालत्ता जप्त केली.  माल्या आपल्या मालमत्तेची विक्री सुरू केल्याची कुणकुण ईडीला लागताच तातडीने जप्तीची कारवाई करण्यात आली.