शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:20 IST

Vikramaditya Singh And Kangana Ranaut : विक्रमादित्य सिंह यांनी भाजपाच्या उमेदवार कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी भाजपाच्या उमेदवार कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विक्रमादित्य सिंह यांनी शनिवारी (11 मे) सांगितले की, अभिनेत्री स्वतःबद्दल इतकं बोलते की, आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही उरलेलं नाही.

लाहौल आणि स्पीतीच्या काझा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना विक्रमादित्य सिंह म्हणाले की, कंगना राणौतने लोकांना सांगावं की, ती स्पीतीमध्ये का आली नाही आणि रेकॉन्ग पीओमधून परत आली? कंगना राणौतने दलाई लामांविरोधात केलेल्या विधानांमुळे तिचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले जाईल या भीतीने कंगना स्पितीमध्ये आली नाही, असा दावा त्यांनी केला.

विक्रमादित्य सिंह यांनी कंगनाला लगावला टोला 

"जर त्यांचं मन शुद्ध असेल तर त्यांनी स्पितीला भेट द्यायला हवी होती. अभिनेत्री कधी कधी म्हणते की, भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि सुभाष चंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. आता तिने स्वतःची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे आणि म्हणू लागली आहे की, अमिताभ बच्चन यांच्यानंतर ती एकमेव कलाकार आहे ज्यांना देशभरातील लोक ओळखतात."

"ती मणिपूरला गेली नाही ही चांगली गोष्ट आहे. ती चुकून मणिपूरला गेली असती तरी ती परत येऊ शकली नसती, कारण भाजपा सरकारने महिलांवरील अत्याचारातून अशी परिस्थिती या ईशान्येकडील राज्यात निर्माण केली आहे. कोरोना साथीच्या काळात ती मनालीमध्ये होती तेव्हा तिने विरोध करणाऱ्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती" असं विक्रमादित्य सिंह यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४mandi-pcमंडी