शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...म्हणून शेतकऱ्यांनी शेतात उभारली हत्तीची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 11:29 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे.

महासमुंद - शेतकरी शेतात राबून अन्नधान्य पिकवत असतात. मात्र अनेक ठिकाणी जंगलातील प्राणी त्यांच्या पिकांचं नुकसान करतात. हत्तींनी धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर येत असतात. हत्ती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करतात. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीची नासधूस करतो. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच देवाकडे प्रार्थना केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील कुकराडीह गावामध्ये शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हत्तींच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेताजवळ ही मूर्ती उभारली आहे. कुकराडीह गावात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान करत आहे. 

शेतकऱ्यांनी अनेकदा याबाबत सरकार आणि प्रशासनाला माहिती दिली. तसेच या समस्येवर काहीतरी मार्ग काढावा असे सांगितले. मात्र प्रशासनाने अद्याप काहीच उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी आता हत्तीची मूर्ती उभारून देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे. 'आम्ही विधिवत पूजा करून शेतामध्ये हत्तीची मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून आमच्या शेताचे रक्षण करेल. हत्तीची ही मूर्ती आमच्या संपूर्ण गावाचं रक्षण करेल असा विश्वास आहे' अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

हत्तींमुळे शेतीचे खूप नुकसान होत आहे. हत्तींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वन विभागाने म्हटलं आहे. मात्र कुकराडीह गावातील  शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच पूजा करून देवाकडे प्रार्थना केली आहे. गणपती बाप्पा हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी त्यांना आशा आहे. वनविभागचे अधिकारी मयांक पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही शेतकऱ्यांचा विश्वासाचा आदर करतो. हत्तींमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.' 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडFarmerशेतकरीagricultureशेती