शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण : अखेर डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
3
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
4
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
8
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
9
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
10
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
11
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
12
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
13
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
14
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
15
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
16
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
17
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
18
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
19
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
20
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय

कथित अफेअरने शहरात लावली आग; लव्ह जिहादच्या आरोपावरून मध्य प्रदेशात हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:15 IST

मध्य प्रदेशात कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठा हिंसाचार उफाळून आला आहे.

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात एका कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात मध्य प्रदेशातील एक मुलगी घरातून पळून गेल्याने कथित लव्ह जिहादच्या संशयावरुन एका समुदायाचे लोक दुसऱ्या समुदायाच्या लोकांशी भिडले. काही वेळातच वादाने हिंसक रुप घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गावात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. जमावाने काही घरे आणि दुकानेही पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सागर जिल्ह्यातील सनोधा भागात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हिंसाचार उसळला. यावेळी दुकाने आणि घरे पेटवून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "आम्हाला सनोधा गावात काही घटनांबद्दल माहिती मिळाली. प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे आणि परिस्थिती शांत आहे. पोलीस दल तैनात आहे, तपास सुरू आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिकता आहे," अशी माहिती सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप जीआर यांनी दिली. 

एका समुदायाच्या तरुणाने हिंदू मुलीचे अपहरण केल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. सनोधा शहरात राहणारी मुलगी कालपासून बेपत्ता आहे. त्याच शहरातील तरुणही कालपासून बेपत्ता आहे. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की त्याच तरुणाने मुलीला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबासह शहरातील लोक रस्त्यावर उतरले. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ देखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सनोधा गावातील त्या मुलीचे लग्न होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी एका मुलाने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केली. ही माहिती पसरताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मुलीचे नातेवाईक आणि समाजातील लोक गावात जमले आणि त्यांनी या विरोधात निषेध करण्यास सुरुवात केली. बिघडलेली परिस्थिती पाहून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोकांनी मुलीला शोधून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.

मुलीसोबत पळून गेलेल्या मुलाच्या गावात असलेल्या दुकानांना आणि घरांना काही लोकांनी आग लावली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. संपूर्ण गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. संतप्त लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस