शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 15:41 IST

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. दोन गटात वाद झाला असून गोळीबारही झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून दोन सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील जिरीबाममध्ये आज सकाळी झालेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला. झोपेत असताना एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी दोन गट शस्त्रासह समोरा समोर आले,या गोळीबारात आणखी ४ जण ठार झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उग्रवादीयांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५ किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात प्रवेश केला आणि तो झोपेत असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर, सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये दोन समुदायांमध्ये वाद सुरू झाला, यामध्ये ३ पहाडी अतिरेक्यांसह ४ सशस्त्र लोकांचा मृत्यू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीलाही जिल्ह्यात जाळपोळीची घटना घडली होती. येथे काही लोकांनी बोरोबेकरा पोलीस ठाण्याच्या जाकुराधोर येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे ३ खोल्यांचे रिकामे घर जाळले होते.

१ ऑगस्ट रोजी आसाममधील कछार येथे सीआरपीएफच्या देखरेखीखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत, दोन भिन्न समुदायांच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापीत करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी एक करार केला. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

जिरिबाम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीला आसाम रायफल्स आणि सीआरपीएफचे जवान आणि जिरीबाम जिल्ह्यातील हमार, मेईतेई, थाडौ, पायते आणि मिझो समुदायांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. जिरिबाम जिल्ह्याबाहेरील अनेक हमर आदिवासी संस्थांनी कराराचा निषेध केला.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार