शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

मेघालयात हिंसाचार; बेकायदा लाकूड वाहतूक रोखल्याने तणाव; पोलिस गोळीबारात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 6:31 AM

आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

गुवाहाटी : आसाम-मेघालय सीमेवर पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे बेकायदा लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडविल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात आणि हिंसाचारात वनरक्षकासह सहा जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  या घटनेनंतर आसामपोलिसांनी मेघालयच्या सीमेवर असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच, मेघालयातील ७ जिल्ह्यांत हिंसाचार उफाळला असून, ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

७ जिल्ह्यांत तणाव; कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त- हिंसाचारानंतर मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या आदेशानुसार, या जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

- यामध्ये पश्चिम जैंतिया हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, रि-भोई, ईस्ट वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्स यांचा समावेश आहे.

- मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

शस्त्रे घेऊन जमाव घटनास्थळी दाखलसंशयितांनी ट्रकमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताच, वनरक्षकांनी त्यावर गोळीबार केला. त्यामुळे ट्रकचा एक टायर फुटला. त्यानंतर, वाहनाचा चालक आणि क्लीनरसह अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, परंतु इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. वनरक्षकांनी झिरकेंडिंग पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, पहाटे ५ च्या सुमारास मेघालयातील नागरिकांचा जमाव मोठ्या संख्येने खंजीर (डाओस) आणि इतर शस्त्रे घेऊन घटनास्थळी जमा झाला होता.

पोलिसांवर हल्लाअटक केलेल्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करणाऱ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला व त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करावा लागला, असे अली म्हणाले. या घटनेत एक वनसंरक्षक आणि मेघालयातील खासी समुदायाचे पाच लोक ठार झाले. स्थिती आता नियंत्रणात आहे, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्गम भागात सुरक्षाव्यवस्था मजबूत करत आहेत.  

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSmugglingतस्करी