शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. एका जमावाने माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर दगडफेक केल्याने त्यांना एका मतदान केंद्रात जाऊन बसावे लागले, तर वाहनचालक घाबरून पळून गेला. त्यानंतर ते वाहन पेटवून देण्यात आले.बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर चोपरा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर सोडला आणि नंतर हवेत गोळीबारही केला. यात कोणीही जखमी झाले नाही. तेथील एका गावातील मतदार मतदान करण्यासाठी निघाले असता, त्यांना विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जाण्यापासून अडवले आणि परत घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून ठेवला. त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना, त्यांच्यावर काही मंडळींनी क्रूड बॉम्बही फेकले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.तरीही जमाव जाण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि शीघ्र कृती दलालाही पाचारण केले. त्यानंतर मात्र तो जमाव निघून गेला. रायगंज मतदारसंघाच्या क्षेत्रात एका जमावाने स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही मारहाण केली. पोलीस तिथे लगेच पोहोचले. त्यामुळे पत्रकाराची सुटका झाली. मात्र त्याला फार मारलागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमधील उधमपूर व श्रीनगर मतदारसंघांमध्येही आज मतदान झाले. उधमपूरमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. श्रीनगरमध्ये मात्र सुमारे १६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. तिथे सकाळपासूनच अतिशय संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी ११ वाजेपर्यंत जेमतेम २ ते ३ टक्केच मतदान झाले होते. सकाळी महिला मतदारच प्रामुख्याने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. मतदानाच्या काळात काश्मीर खोºयात हिंसाचार मात्र झाला नाही.>कार्यकर्ते भिडलेतामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली असली तरी तेथील अंबुर व गुडियातम विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुक व एएमएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून त्या जमावाला पांगवावे लागले. तिथे निमलष्करी दलांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे सांगण्यात आले. त्याआधी सकाळी अण्णाद्रमुकवर बुथ बळकावून खोटे मतदान केल्याचा आरोप द्रमुकचे सरचिटणीस एम. के. स्टॅलिन यांनी केला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला. कुठेही बुथ बळकावण्याचे प्रकार झालेले नाहीत, असे अधिकाºयांनी सांगितले. तामिळनाडूत मतदानाला आलेले तीन वृद्ध मरण पावल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जी