शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

गुजरातमधील आंदोलनास हिंसक वळण, ४ ठार

By admin | Published: August 26, 2015 9:05 AM

गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने बुधवारी हिंसक वळण घेतले.

ऑनलाइन लोकमत.
अहमदाबाद, दि. २६ -  ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, अन्यथा २०१७ च्या निवडणुकीत गुजरातेत कमळ फुलणार नाही, असे जाहीर आव्हान देत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुजरातमधील पटेल समुदायाच्या  अहमदाबादेतील भव्य रॅली विविध कारणांनी गाजली. रॅलीला हिंसेचे गालबोट लागले, निकोल परिसरात सरकारी सेवा केंद्राची जाळपोळ, सात लाख रुपयांची रोख रक्कम जळाली आणि सर्व कादपत्रे जळाली तर अहमदाबादच्या चांदलोडिया परिसरात आंदोलकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक तोडून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार अंदोलनकर्ते ठार झाले आहे. रॅलीदरम्यान प्रत्यक्ष रॅलीस्थळी आणि शहरात अनेक ठिकाणी संघर्ष उडाला. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराचे नळकांडे फोडावे लागले. यादरम्यान आंदोलनकर्ते माजी आमदार शंकरराव गडाख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असल्याचे वृत आहे.
अहमदाबादमध्ये १३ वर्षांनंतर नऊ भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सूरत व अहमदाबादमधील शाळा- कॉलेजेस आज बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान गुजरातमधील या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला असून अनेक ट्रेन्सचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी आरक्षण दिले जावे. जर भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करता आली नाही, तर 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील. आरक्षण नाही तर गुजरातमध्ये कमळदेखील नाही, असा इशाराच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे "महाक्रांती‘ रॅलीमध्ये बोलताना दिला होता. 
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळही उमलणार नाही असा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला होता.
 
मोदींनी गुजरातच्या जनतेला केले शांतता राखण्याचे आवाहन 
हिंसेतून कोणाचंही भल होत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पटेल समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कालपासून गुजरात धुमसत आहे. संतप्त जमावाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यात जाळपोळ व दगडफेक केली असून अहमदाबादमधील नऊ भागातं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजराती भाषेतून संदेश दिला. ' जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतानाच चर्चेद्वारे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात' असे मोदी म्हणाले. गुजरातमधील सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. ' हिंसेतून कधीही कोणाचा लाभ होऊ शकत नाही. मात्र जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर त्यात सर्वांचेच हित आहे. मी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. गुजरात विकासाची नवी उंची गाठत असून राज्यातील संपूर्ण जनतेने त्यात सहभागी व्हायला हवे. लोकशाहीच्या मर्यादेचे सर्वांनी पालन केले पाहिजे,' असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.