शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

"कधी बॉम्ब पडेल माहीत नाही, स्वप्नातही सायरनचा आवाज येतो"; थरकाप उडवणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 2:11 PM

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले आहेत. मात्र, भारत सरकार आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले आहेत. मात्र, भारत सरकार आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत आहे. घरी परतणाऱ्या या लोकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. असाच एक विद्यार्थी म्हणजे विपिन शर्मा जो नुकताच भरतपूरला परतला आहे. युद्धातील दृश्य पाहून विपिन अजूनही घाबरतो.

विपिनने सांगितलं की, सायरनचा आवाज ऐकून तो शेल्टरमध्ये जायचा. हे युद्ध एखाद्या दुःखद कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा युद्ध होतं तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याला स्वप्नातही सायरनचा आवाज यायचा. विपिन हा इस्रायलच्या वेस्ट बँक येथील एरियल विद्यापीठात कॅन्सरवर संशोधन करत आहेत. तो गाझा पट्टीपासून 100 किलोमीटर दूर राहत होता.

विपिनने दिलेल्या माहितीनुसार, युद्धादरम्यान त्याला भीती वाटत होती की, कधी मिसाईल आपल्यावर पडेल काय माहीत. ज्या ठिकाणी युद्ध सुरू होतं ते गाझामध्ये असलं तरी युद्धाची दहशत हृदयात व मनात घर करून होती. एरियल युनिव्हर्सिटीने युद्धाच्या दृष्टीने बॉम्ब शेल्टर बांधले होते. जेव्हा जेव्हा सायरन वाजायचा तेव्हा ते या शेल्टरमध्ये आसरा घेत असत. या वेळी सायरन वाजल्यानंतर 10 सेकंदात शेल्टरमध्ये जावे लागले.

आपली पत्नी आणि मुलाला घेऊन जाण्यासाठी व्हिसाची तयारी केली होती. मात्र आता युद्धामुळे ते रद्द करण्यात आले आहे. जोपर्यंत शांतता होत नाही तोपर्यंत सोडण्याचा विचार नाही असं देखील म्हटलं आहे. विपिन शर्मा यांचे वडील उमेश शर्मा हे राष्ट्रीय मोहरी संशोधन संचालनालयात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध