शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"AAP चोरांना वाचवतेय"; भाजपाने पुन्हा केली अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 13:01 IST

Arvind Kejriwal And Virendra Sachdeva : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "आमची मागणी आहे की, अरविंद केजरीवाल भ्रष्ट असून त्यांनी दिल्लीची लूट केली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. आप चोरांना वाचवत आहे. आमचा लढा हा दिल्लीतील जनतेचा लढा आहे."

 "अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला लुटण्याचे काम केले आहे. अटकेत असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी ठेवणे ही कोणती नैतिकता आहे? आम आदमी पक्षाने याचा विचार करावा आणि अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा" असं वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे. 

"जर अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 वर्षात जनतेची सेवा केली असती तर त्यांना आता हे बनावट पत्र देण्याची गरज पडली नसती. 8-9 वर्षात दिल्लीला पिण्याचे पाणी देऊ शकलो नाही. घाण पाणी येत असून गटारे ओसंडून वाहत आहेत. तुम्ही लोकांनी काय दिलं, दिल्ली लुटण्याशिवाय तुम्ही काहीही केलं नाही, ही चिंता आज तुरुंगात सतावत आहे."

"आणखी एक चिंतेची बाब आहे की, तिथे त्यांना आपल्या राजमहालाची आठवण येत आहे. ज्या सुविधा त्यांना तिथे मिळत होत्या त्या तुरुंगात दिल्या जात नाहीत. त्यामुळे ते अधिक त्रस्त आहे. मंत्री आतिशी आणि मंत्री सौरभ भारद्वाज यावर चर्चा करत नाहीत. त्यावर चर्चा व्हायला हवी" असं देखील भाजपा नेत्याने म्हटलं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारण