शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी किमान ५० टक्केच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:47 IST

निवडणुकीची विश्वासार्हता : २१ विरोधी पक्षांची सुप्रीम कोर्टात आग्रही भूमिका

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातील किमान ५० टक्के मतदानयंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी केल्याने निवडणुकीचा निकाल काही दिवसांनी लांबणार असेल तरी निवडणुकीच्या नि:ष्पक्षतेची देशातील जनतेला नि:संदिग्धपणे ग्वाही मिळावी यासाठी तशी पडताळाणी करणे गरजेचे आहे, अशी ठाम भूमाका २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.

येत्या निवडणुकीत देशभरातील सर्व १० लाख मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदानयंत्रे वापरण्यात येणार आहेत. मात्र निकाल जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एक मतदानयंत्र सरधोपटपणे निवडून त्यातील मतांची ‘व्हीव्हीपॅट’शी पडताळणी करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. मात्र अशी पडताळणी किमान ५० टक्के मतदानयंत्रांच्या बाबतीत केली जावी, अशी विनंती करणारी याचिका २१ विरोधी पक्षांनी न्यायालयात केली आहे.

सुनावणीच्या पहिल्या तारखेला खुद्द न्यायालयानेही पडताळणीचे प्रमाण वाढविण्यास अनुकुलता दर्श विली होती व निवडणूक आयोगास भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यावर आयोगाने प्रतिज्ञापत्र करून प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर अधिक व्यापक पडताळणीस विरोध केला.एक म्हणजे, सध्या ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणीचे जे प्रमाण ठरविले आहे ते निवडणुकीच्या नि:ष्पक्षतेची खात्री करण्यासाठी पुरेसे आहे. ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ या मान्यवर संस्थेनेच हे प्रमाण योग्य असल्याचे कळविले आहे. दुसरे असे की, विरोधी पक्ष म्हणतात तशी ५० टक्के पडताळणी करायची झाल्यास निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास पाच ते सहा दिवसांचा विलंब होईल. त्यामुळे पडताळणीचे प्रमाण वाढविल्याने विश्वासार्हता वाढणार नसल्याने अधिक व्यापक पडताळणी करणे निरर्थक ठरेल.

आयोगाच्या या भूमिकेचा प्रतिवाद करताना विरोधी पक्षांनी न्यायालयास असे कळविले आहे की, एकीकडे निवडणुकीची विश्वासार्हता व दुसरीकडे निकालास होणारा संभाव्य विलंब यांचा तौलनिक विचार केला तर संभाव्य विलंबाहून नि:संशय विश्वासार्हता अधिक महत्वाची आहे. त्यामुळे निकाल काही दिवसांनी लांबले तरी मतदानापूर्वी किंवा नंतर मतदानयंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी झालेली नाही याची पक्की खात्री पटण्यासाठी अधिक व्यापक पडताळणी होणेच गरजेचे आहे.

या पक्षांनी असेही म्हटले की, मुळात मतदानयंत्रांसोबत ‘व्हीव्हीपॅट’ची सोय न्यायालयाच्याच आदेशाने करण्यात आली आहे. दिलेले मत यंत्रात योग्यप्रकारे नोंदले गेले आहे, याची मतदाराला खात्री पटवून घेता यावी यासाठी ही सोय करण्यात आली आहे. आयोग म्हणतो तशी जुजबी पडताळणी केली तर हा आदेश देण्यामागचा न्यायालयाचा मूळ हेतू साध्य झाल्यासारखे होणार नाही.

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर पुढील सुनावणी व्हायची आहे. दोन्ही पक्षांची सविस्तर प्रतिज्ञापत्रे सादर झाली आहेत व येत्या दोन दिवसांत निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान व्हायचे आहे हे लक्षात घेता यावर सुनावणी घेऊन न्यायालय निकाल देईल, अशी अपेक्षा आहे.