शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

राष्ट्रपित्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल

By admin | Published: January 31, 2016 12:41 AM

खादीच्या माध्यमाने देशवासीयांना स्वावलंबी बनविण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले सरकार आगेकूच करीत असून विविध सरकारी आस्थापनांमध्ये

नवी दिल्ली : खादीच्या माध्यमाने देशवासीयांना स्वावलंबी बनविण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले सरकार आगेकूच करीत असून विविध सरकारी आस्थापनांमध्ये खादीच्या उत्पादनांचा वापर केला जात आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मोदी यांच्यासह साऱ्या देशाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांना श्रद्धांजली वाहिली. नव्याने स्थापित खादी आणि ग्रामोद्योग आयोग नव्या संधी आणि आव्हाने लक्षात घेऊन अनेक महत्त्वाची पावले उचलित आहे. याअंतर्गत सौर चरखा आणि सौरलूमद्वारे उत्पादनाचा यशस्वी प्रयत्न होत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारी खादी आज फॅशन झाली असून गावागावात खादी व ग्रामोद्योगाचे जाळे तयार करण्याची सरकारची मनीषा आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान राष्ट्रपती मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी राजघाटवरील बापूंच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि नगरविकास मंत्री एम.वेंकय्या नायडू, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अन्य नेत्यांचाही यात समावेश होता. नायडू यांच्या हस्ते राजघाटावर कस्तुरबा स्मृती केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन यानिमित्त करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, बाबुल सुप्रियो, राव इंद्रजीतसिंग, तीनही सेनांचे प्रमुख जनरल दलबिरसिंग, एअर चीफ मार्शल अरुप राहा आणि अ‍ॅडमिरल रॉबिन धवन यावेळी उपस्थित होते. तोफांची सलामी आणि भजनाचा कार्यक्रम झाला. हुतात्मादिनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.