शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कडक सॅल्यूट! शहीद दिनानिमित्त 6 तासांचा 42 किमी पायी प्रवास करत 42 वेळा केलं 'रक्तदान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:12 IST

Blood Donation : रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे.

नवी दिल्ली - शहीद दिनानिमित्त देशातील काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या गावापासून 42 किमी अंतरावर असलेल्या रक्तदान शिबिराला जाऊन पुन्हा एकदा रक्तदान केलं आहे. यासाठी त्यांनी सहा तास सलग पायी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. 'रक्तदान करणारी व्यक्ती' अशी विनोदची नवीन ओळख निर्माण झाली असून त्यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जाखड़ हे 39 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. आज शहीद दिनानिमित्त त्यांनी लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करण्यासाठी एक पदयात्रा काढली होती. त्याच निमित्ताने ते रक्तदान करण्यासाठी सलग सहा तास 42 किलोमीटर पायी प्रवास केला आहे. याच दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने अनेक ठिकाणी फुलांचा माळा घालून विनोद यांचं यासाठी स्वागत करण्यात आलं. ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी रक्तदानासाठी जागरूकता निर्माण केली असून रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

काही ठिकाणी रक्तदानाबाबत अफवा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेक जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र असं काहीही नसल्याचं विनोद यांनी म्हटलं आहे. संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास त्याला यामुळे मदत मिळू शकते. अनेकदा वेळीच रक्त न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रक्तदान करून लोकांचा जीव वाचवा, त्यांना मदत करा असं विनोद यांनी म्हटलं आहे. 101 वेळा रक्तदान करण्याची विनोद जाखड यांची इच्छा आहे. 

101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प

वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाल्याची माहिती विनोद यांनी दिली आहे. 101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते स्वत: तर रक्तदान करतातच पण इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. रक्तदान केल्यानं आपण फक्त आजारी व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. तसेच स्वतःच्या शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे. म्हणूनच लोकांनी रक्तदानाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये असं विनोद यांनी म्हटलं आहे. विनोद यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीIndiaभारत