शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

संसद चालावी ही इच्छा, सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको असल्याचा आरोप : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:37 IST

अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींनी केला. 

नवी दिल्ली : संसदेचे कामकाज चालावे ही आमची इच्छा आहे. मात्र, केंद्र सरकारची अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकावे यासाठी गांधींनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओब बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गांधींनी सरकारवर टीका केली.

सभागृहात कामकाज चालावे हा आमचा उद्देश असून संसेदत चर्चा व्हायला हवी. सत्ताधाऱ्यांना माझ्याबद्दल जे काही बोलायचे आहे, ते त्यांनी बोलावे. मात्र, संसदेचे कामकाज सुरळीत चालायला हवे. १३ व १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर चर्चा करण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे ही चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींनी केला. 

सोरोस मुद्द्यावरून सदन स्थगित लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सोरोस प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थिती लपवण्यासाठी जॉर्ज सोरोस प्रकरणाचा ढाली प्रमाणे वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.नंतर सत्ताधाऱ्यांनी सोरोससोबत संगनमत करून काँग्रेस देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. नंतर गोंधळामुळे कामकाज दीड तास स्थगित झाले.

अणुऊर्जा क्षमता तिप्पट होईलnभारतीची अणुऊर्जा क्षमता गत दशकात दुप्पट झाली असून ती २०३१ पर्यंत तिप्पट होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.nगत दोन दशकात अणुऊर्जा क्षमता ४,७८० मेगावॅटवरून ८,०८१ मेगावॅट झाली आहे. मात्र, त्यात वाढ होऊन ती २०३१-३२ मध्ये २२,४८० मेगावॉट होईल, अशी अपेक्षा असल्याचे सिंह यांनी सांगितले. 

...तरच एआय कायदा शक्यसंसद व समाजाची परवानगी असेल तरच केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करण्यासंदर्भात कायदा करण्यास तयार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. काँग्रेस खासदार अदूर प्रकाश यांच्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव बोलत होते.

तिरंगा व गुलाब देत विरोधकांची निदर्शनेnअदानी समूहाशी निगडित मुद्यावर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने संसद परिसरात निदर्शने केली.nदरम्यान विरोधकांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना तिरंगा व गुलाबाची फुले भेट देत आंदोलन केले. संसद भवनाच्या मकरद्वारजवळ एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या हातात तिरंगा झेंडा व गुलाबाचे फुले होती.nकाँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व इंडिया आघाडीतील काही घटक पक्ष या निदर्शनात सहभागी झाले होते. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीदेखील या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी