शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वक्फ सुधारणा विधेयकासाठी JPC स्थापन, लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:44 IST

waqf act amendment bill 2024 : ही समिती आता वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल.

waqf act amendment bill 2024 : नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकासाठी सरकारनं संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभेतील २१ आणि राज्यसभेतील १० सदस्यांचा समावेश आहे. ही समिती आता वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल.

समितीमधील लोकसभेच्या सदस्यांमध्ये जगदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या दिलीप सैकिया, गौरव गोगोई, इम्रान मसूद, कृष्णा देवरयालू, मोहम्मद जावेद, कल्याण बॅनर्जी, ए राजा, दिलेश्वर कामैत, अरविंद सावंत, नरेश मस्के, अरुण भारती आणि असदुद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे.  

सरकारनं हे विधेयक लोकसभेत एक दिवस आधी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सादर केलं. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सभागृहात मांडताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेससह इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी या विधेयकाला मुस्लिमविरोधी ठरवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी हे विधेयक संविधानावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं अयोध्या मंदिर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गैर-हिंदू त्याचा सदस्य होऊ शकतो का? मग, वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम सदस्यांची चर्चा का? हा थेट मुस्लिमांवर हल्ला आहे. यानंतर पुन्हा ख्रिश्चनांवर आणि नंतर जैनांवर केला जाईल, असं ते म्हणाले.

दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारचा प्रस्तावित वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली वक्फ जमीन विकण्याचा डाव असल्याचा आरोप केला. सरकार रिअल इस्टेट कंपनीसारखे काम करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. तसंच, मुस्लिमांवर हा अन्याय का होत आहे, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते मोहिबुल्लाह नदवी यांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विरोध केल्यानंतर, अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, वक्फ कायदा १९९५ आपलं उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झाला नाही. जी कामं तुमचं सरकार करू शकलं नाही, ती पूर्ण करण्यासाठी हे सुधारणा विधेयक आणलं जात आहे. यामुळं कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप होत नाही आणि संविधानाच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन होत नाही.

टॅग्स :Parliamentसंसद