शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

हे तर शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध

By admin | Published: June 06, 2017 11:06 PM

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच मध्य प्रदेशात मंदासौर जिल्हात काल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर  पोलिसांना गोळीबार केला. या गोळीबारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली असून, शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार म्हणजे सरकारने शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्धच आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू  झाला होता. दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून निषेध केला आहे. हे सरकार आपल्याच देशातील शेतकऱ्यांविरोधात युद्ध पुकारत असल्याचे राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांच्याबरोबरच मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. अन्नदात्यावर गोळी चालवणे अत्यंत दु:खद आहे. आजचा दिवस मध्य प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे शिंदेंनी म्हटले आहे.