शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

ज्या व्यक्तीवरून गलवान खोऱ्याचे पडले नाव, त्याच्या वारसांनी भारत-चीन वादावर दिली अशी प्रतिक्रिया... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 4:28 PM

१५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेतया भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावालडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे

 लेह (लडाख) -  लडाखमधील गलवान खोऱ्यात सध्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. १५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

"गेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेत. या भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा," असे गुलाम रसूल गलवान याचे वारस अमिन गलवान यांनी सांगितले.

लडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे. याच ठिकाणी 1962, 1975 आणि सोमवारी चीनसोबत संघर्ष झाला होता. गलवान खोऱ्याचा इतिहास 121 वर्षे जुना आहे. या खोऱ्याचे नावही भारतीय नागरिकावरून पडलेले आहे. लडाखमधील गुराखी गुलाम रसूल गलवान याने ही घाटी शोधली होती. गुलमाने त्याच्या पुस्तकातील "द फाइट ऑफ चाइनीज" या अध्यायामध्ये याबाबत सांगितले आहे.गुलामचा जन्म 1878 मध्ये झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने घर सोडले होते. त्याच्या डोक्यात केवळ नवीन जागा शोधण्याचे विचार घोळत असायचे. याच त्याच्या छंदाने त्याला इंग्रजांचा आवडता गाईड बनविले. खरे पाहता लडाखचा भाग इंग्रजांना आवडत नव्हता.

1899 मध्ये गुलामने लेहहून ट्रेकिंग सुरु केली. आणि लडाखच्या आसपासच्या अनेक नवीन भागांमध्ये पोहोचला. यामध्ये एक होती गलवान खोरे आणि नदी. ही एक ऐतिहासिक घटनाच मानावी लागेल कारण या नदीचे आणि खोऱ्याचे नाव एका गुराख्यावरून ठेवण्यात आले. गुलामने गलवान नावामागे त्याच्या आईने ऐकवलेली कहानी सांगितली आहे. तेव्हा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिंदू महाराजांचे राज्य होते. त्याच्या वडिलांचे नाव कर्रा गलवान होते. कर्रा म्हणजे काळा आणि गलवान म्हणजे डाकू, दरोडेखोर. कर्रा त्याच्या टोळक्याचा म्होरक्या होता. तो फक्त श्रीमंतांना लुटत होता आणि मिळालेला पैसा गरीबांमध्ये वाटत होता.

काही काळानंतर गुलामच्या वडिलांना म्हणजेच कर्राला डोगरा राजाच्या शिपायांनी पकडले आणि मृत्यूदंड दिला. यानंतर गलवान टोळीचे लोक लेह आणि बाल्टिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. तर काही गलवान हे चीनच्या शिंजियांग प्रांताच्या यारकन्दमध्ये स्थायिक झाले. फॉरसिकिंग पॅराडाईज पुस्तकानुसार गुलाम रसूल 15 महिन्यांमध्ये आशिया आणि तिबेटची कठीण यात्रा केली होती. लेहच्या चंस्पा योरतुंग रोडवर गुलाम रसूलच्या पूर्वजांचे घर आहे. त्यांच्या नावे गलवान गेस्ट हाऊसही आहे. आता त्यांची चौथी पीढी तिथे राहत आहे. त्यांचे वारसदार येणाऱ्या पाहुण्यांना रसूलचे किस्से सांगतात.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन