शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

नोंदणी नाकारणाऱ्या आधार केंद्रांना इशारा

By admin | Published: July 05, 2017 12:47 AM

आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा सर्व केंद्रांना गंभीर इशारा दिला आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन आधार नोंदणी नाकारणे ‘भ्रष्ट कृत्य’ म्हणून गृहीत धरले जाईल, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.आधार प्राधिकरणाचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले की, नोंदणी केंद्रचालकांना परवान्याचे दर १0 दिवसांनी नूतनीकरण करून घ्यावे लागते. सेवा देण्यास पात्र असल्याचे प्रमाणित करून घ्यावे लागते, अशा स्थितीत तांत्रिक बिघाडाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तांत्रिक बिघाडाचे कारण देणे म्हणजे केंद्राची पात्रता नाही हे मान्य करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे तांत्रिक कारण देऊन कोणाही नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकास परत पाठविता येणार नाही.पांडे म्हणाले की, आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनेक आधार केंद्रांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. काही ना काही कारणे पुढे करून आधार ही केंद्रे नागरिकांना आधार नोंदणी करण्याचे नाकारत आहेत, अशा प्रकारांना भ्रष्ट कृत्य म्हणून गृहीत धरले जाईल.पांडे यांनी म्हटले की, आधार केंद्रचालक आमच्याकडे स्वत:च्या केंद्राची नोंदणी करतात. तसेच दर १0 दिवसांनी नोंदणी नूतनीकृत करतात. ते जेव्हा नोंदणी करतात, तेव्हा त्यांचे यंत्र काम करीत असून नागरिकांची नोंदणी करण्यास ते सक्षम आहेत, असे गृहीत धरले जाते. असे असताना केंद्रचालक लोकांना नोंदणी न करता परत कसे काय पाठवू शकतात?२५ हजार केंद्रेआधारची नोंदणी करण्यासाठी देशभरात २५ हजार केंद्रे कार्यरत आहेत. सध्या ही आधार केंद्रे चालकांच्या मालकीच्या इमारतीत चालविली जातात. ही केंद्रे येत्या काही आठवड्यांत सरकारी आणि पालिकांच्या इमारतींत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापुढे आधार नोंदणी सरकारी कार्यालयांमध्येच केली जाणार आहे. तसे सरकारतर्फे जाहीरही करण्यात आले आहे.