शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'रस्ते बनवण्यासाठी कचऱ्याचा वापर; देश प्रदूषणमुक्त होणार', नितीन गडकरींची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 19:41 IST

Nitin Gadkari Interview: 'लवकरच धोरण आणले जाईल, स्वच्छ भारत अभियानालाही चालना मिळेल.'

Nitin Gadkari Exclusive: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा वेग सर्वांनाच माहित आहे. भाजप सत्तेत आल्यापासून गडकरींच्या मंत्रालयाने अनेक महामार्गांची निर्मिती केली आहे. मेट्रो सिटीपासून ते अतिशय मागास भागांमध्येही गडकरींनी रस्ते बांधले आहेत. दरम्यान, देशाला प्रदुषण आणि कचरामुक्त करण्यासाठी गडकरींनी एक मोठी योजना आखली आहे.

ABP न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत गडकरींनी 'ग्रीन एक्स्प्रेस वे' प्रकल्पाची माहिती दिली. नितीन गडकरींनी शुक्रवारी (15 सप्टेंबर) सांगितले की, देशात अमेरिकन तंत्रज्ञानावर काम केले जात आहे. याअंतर्गत देशातील महामार्गांच्या निर्मितीत कचऱ्याचा वापर केला जातोय. कचऱ्यापासून रस्ते निर्मितीला 'ग्रीन एक्स्प्रेस वे' प्रकल्प म्हटले जात आहे.

‘गांधी जयंतीनिमित्त धोरण आणणार’ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही गाझीपूरच्या कचऱ्याच्या डोंगरातून दिल्लीत अनेक रस्ते बनवले आहेत. या प्रकल्पामुळे देश कचरामुक्त होण्यात महत होईल. अहमदाबादमध्ये रस्ता तयार करतानाही 25 ते 30 टन कचरा वापरल्याची माहिती त्यांनी दिली. हा कचरा अहमदाबादच्या लँडफिल साइटचा होता. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त याबाबत धोरण आणत आहोत. यामुळे आपल्या स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळेल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

G-20 मधून देशाला कोणते फायदे G-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल? यावर केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले की, आपला देश पेट्रोल, डिझेल आणि गॅस इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर घेतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वापरामुळेही प्रदूषण होत आहे. G-20 शिखर परिषदेदरम्यान, आम्ही ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्सची घोषणा केली आहे. जैवइंधनामध्ये इथेनॉलचाही समावेश आहे, जे आपले शेतकरी तयार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर काय म्हणालेपेट्रोल-डिझेल वाहनांवर ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांवर खूपच कमी जीएसटी आहे. सरकार आले तेव्हा देशात 48 टक्के डिझेल कार विकल्या जात होत्या, आता हा आकडा 18 टक्क्यांवर आला आहे. डिझेल खूप धोकादायक आहे. लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक फायदा होईल, म्हणून ते त्याकडे वळत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारhighwayमहामार्गGarbage Disposal Issueकचरा प्रश्न