शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

अतांत्रिक लोकांचा जलसंधारणाच्या कामात धूमाकूळ जलसंपत्ती दिन विशेष : जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची सरकारवर टिका

By admin | Published: April 24, 2016 12:39 AM

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.
जलसंपत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. खानापूरकर हे मूळचे रावेर तालुक्यातील आहे. त्यांनी खान्देशसाठी शिरपूर पॅटर्न राबविण्याची मागणी पुन्हा एकदा यासंवादाच्या निमित्ताने केली.
पाणी प्रश्न कायम
पाणी प्रश्न मागील ६० वर्षे कायम आहे. शेतकर्‍यांना फक्त आश्वासने दिली जातात. शेतीला सोडा पण आता तर प्यायला पुरेसे पाणी नाही. अलीकडे या सरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, पण जेथे मागील काळात ही कामे झाली त्या गावांमध्येही टंचाई आहे. खान्देशात तशी स्थिती दिसून येते. दोन फूट खड्डा करा आणि आजूबाजूला माती टाका... फोटो काढा आणि बिले काढून घ्या..., असा प्रकार सुरू आहे. कृषि विभाग अतांत्रिक पद्धतीने हे काम करीत आहे. या अशाच अतांत्रिक लोकांनी मागील ४० वर्षे राज्यात जलसंधारणाची कामे केली म्हणून पाणीप्रश्न अधिक भीषण बनला असेही खानापूरकर म्हणाले.
जलसंधारण तांत्रिक पद्धतीने व्हावे
जलसंधारण हे तांत्रिक पद्धतीने भूजल शास्त्रज्ञ व स्थापत्य अभियंता यांच्यामाध्यमातून व्हावे. शिरपूर पॅटर्न अशाच पद्धतीने झाला. शिरपूर तालुका ८० टक्के बागायती आहे. एकही शेतकरी आत्महत्या नाही..., हे कामाचे फलित आहे. खान्देशात किंवा राज्यात अन्यत्र आठ हजार मी.मी.पाऊस पडला आणि अतांत्रिक पद्धतीने जलसंधारणाचे काम सुरू राहीले तर टँकरमुक्ती होऊ शकणार नाही, असेही खानापूरकर यांनी सांगितले.

पाणी पातळी खालावली
जिल्‘ात गिरणा काठावर शेती उजाड झाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव आदी तालुक्यांमधील गिरणाकाठच्या गावांमध्ये ८० फुटांवर पाणी मिळायचे. पण आता २०० फूट कूपनलिका करूनही पाणी मिळत नाही. २०० फूट कूपनलिका करायला ४५ हजार रुपये खर्च येतो. पाणी पुरेसे नसले तर हा खर्च वाया जातो. गिराणा नदीवर किंवा गिरणाकाठच्या भागात जलसंधारणाची कामे न झाल्याने केळी, लिंबूची शेती उजाड झाली.