शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

२०५० मध्ये भारतावर पाणी परदेशातून मागवण्याचं संकट

By admin | Published: April 22, 2016 12:40 PM

पाण्याची समस्या कायम राहिल्यास 2050 साली भारताला पिण्याचं पाणी परदेशातून आयात करावं लागू शकत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २२ - भविष्यात देशातील पाणीसंकट समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. पाण्याची समस्या कायम राहिल्यास 2050 साली भारताला पिण्याचं पाणी परदेशातून आयात करावं लागू शकत. भुगर्भातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून 2050 पर्यंत प्रत्येक व्यक्तिमागे 3120 लिटर पाणीसाठा शिल्लक राहील अशी शक्यता केंद्रीय भूजल मंडळाने व्यक्त केली आहे. 
 
आकडेवारीनुसार सध्या देशात प्रत्येक व्यक्तिमागे 5120 लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. 1951मध्ये हा पाणीसाठा 14180 लिटर होता. इतक्या वर्षात हा पाणीसाठा 35 टक्क्यांनी कमी झाला आहे. 1991 मध्ये पाणीसाठी हा अर्ध्याहून कमी झाला होता. तर 2025 पर्यंत फक्त 25 टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. सध्या ज्याप्रकारे पाण्याचा अपव्यय केला जात आहे तो पाहता 2050 पर्यंत फक्त 22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहण्याचा इशारा केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे. 
पावसाच्या पाण्याची तलाव, विहिरींमध्ये साठवण न करणे, लोकांमध्ये जागरुकता नसणे अशा अनेक समस्यांमुळे ही परिस्थिती आपण ओढवून घेतल्याचं मत काही तज्ञांनी व्यक्त केलं आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या मागण्या पाहता भविष्यात पाणीसंकट गंभीर होईल. भुगर्भात इतकाच पाणीसाठी शिल्लक असेल जितकं पाणी आपण एका दिवसात वापरतो.