शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

कर्नाटकला भेडसावणार यंदा भीषण पाणीटंचाई

By admin | Published: October 13, 2016 4:51 AM

पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या असून, पुढच्या मान्सूनला अजून बराच अवकाश असल्यामुळे आगामी काळ कर्नाटकसाठी अत्यंत खडतर

बंगळुरू : पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या असून, पुढच्या मान्सूनला अजून बराच अवकाश असल्यामुळे आगामी काळ कर्नाटकसाठी अत्यंत खडतर राहू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कावेरी तंट्यावरील तोडग्याबाबत अनिश्चितता असली तरी येणारा उन्हाळा कर्नाटकसाठी भीषण राहील याबाबत पर्यावरणतज्ज्ञांमध्ये अजिबात दुमत नाही. पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकला आतापर्यंतच्या सर्वात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, असे पर्यावरणतज्ज्ञ दिनेश होल्ला यांनी सांगितले. होल्ला हे ‘सह्याद्री संचय’ संस्थेचे समन्वयक आहेत. ही संस्था पश्चिम घाटाच्या संवर्धनाचे कार्य करते. नेत्रावती आणि तिच्या उपनद्यांमध्ये फारच थोडे पाणी उरल्याचे पाहून आपल्याला धक्काच बसला, असे ते म्हणाले. आम्ही गेल्या २२ वर्षांपासून गिर्यारोहण करीत असून हा भाग आणि तेथे होत असलेल्या पर्यावरणीय बदलाची आम्हाला चांगली कल्पना आहे. सह्याद्री संचयतर्फे दरवर्षी पावसाळी गिरीभ्रमण आयोजित करण्यात येते. पश्चिम घाटात उगम पावणारी नेत्रावती नदी आणि तिच्या नऊ उपनद्या आणि ४२ ओहळ आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ओसंडून वाहत असतात; परंतु यावेळी हे चित्र नाही. एरवी धो धो वाहणारे नेत्रावतीचे धबधबे यंदा लक्षणीयरीत्या क्षीण झाले आहेत. पश्चिम घाटात सध्या जानेवारी-मार्चदरम्यान असते तशी परिस्थिती आहे. यावर्षी पहिल्यांदाच दक्षिण कन्नड जिल्हाही पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरा जातोय. पुढच्या मान्सूनपर्यंतचा काळ केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी भीषण ठरणार आहे, असा इशारा होल्ला यांनी दिला. सह्याद्री संचयच्या पथकाने मृत्युंजय नदीच्या काठावरील मधुगुंडी भागात अलीकडेच गिरीभ्रमण केले. चारमदी घाटातील मृत्युंजय नदी नेत्रावतीची उपनदी आहे. (वृत्तसंस्था)