शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

सासवड नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Published: June 08, 2016 1:50 AM

सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्याने आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी दिली.

सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्याने आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी दिली.
सासवडचा पाणीपुरवठा विजेअभावी बंद झाल्यावर, नगराध्यक्षांनी संपर्क साधला, अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित कामे करून वीजपुरवठा सुरू केला. रविवार, दि. ५ जून, दुपारी १ पासून पाणीपुरवठा सुरू झाला व सोमवारपासून पाणी शहरास मिळू लागले.
ज्या नागरिकांना पाणी मिळाले नाही, त्यांना पाणी द्यावे, असे आवाहन सासवडमधील टँकरमालकांना करण्यात आले. त्यास प्रतिसाद देऊन सासवडमधील प्रमोद बोरावके, वसंत बोरावके, संतोष जगताप, नितीन भोंगळे, विलास गिरमे, पुरंदर मिल्क प्रोडक्ट यांनी पाण्यासह टँंकर दिले. ते पाणी नागरिकांना देण्यात आले. यापुढे गरज भासल्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. नगरपालिकेने त्यांचे आभार मानले.
दरम्यान, सासवड शहराला या टंचाईकाळात घोरवडी धरणातून पाणी द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा यांनी दूरध्वनीवरून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना केले. त्यास प्रतिसाद मिळाला नाही, असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले . सासवडच्या पाणी पुरवठ्याबाबत नगरपालिका दवंडीद्वारे नागरिकांना माहिती देत असते. वस्तुस्थिती माहिती झाल्याने नागरिकही तक्रार न करता सहकार्य करतात, असे नगराध्यक्ष म्हणाल्या. पाणीटंचाई काळात महावितरणचे अधिकारी, सासवड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस काम करून पाणीपुरवठा करतात. त्यांना नगर पालिकेने धन्यवाद दिले आहेत.