शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
2
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
3
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
4
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
5
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
6
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
7
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
8
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
9
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
10
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
11
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
12
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
13
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
14
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
15
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
16
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
17
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
18
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
20
JEE Mains 2025: राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर

वायनाड दुर्घटना, लष्कराने वाचविले १,५९२ लोकांचे प्राण; मृतांचा आकडा २००, तर २१९ वर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 06:43 IST

अनेक अलर्ट दिले होते: अमित शाह, कोणतेही अलर्ट मिळाले नाही: मुख्यमंत्री पिनराई विजयन

वायनाड/नवी दिल्ली :केरळमधीलवायनाड जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेआधी केरळला अनेक अलर्ट देण्यात आले होते असा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केला असून, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र आम्हाला दुर्घटनेपूर्वी कोणतेही रेड अॅलर्ट मिळाले नव्हते, असे म्हटले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २००, तर जखमींचा आकडा २१९हून अधिक झाला आहे, तर अद्याप १९१जण बेपत्ता आहेत. दरडींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध अद्यापही सुरू असून दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरडींच्या ढिगाऱ्याखालून सुमारे १,५९२ लोकांची लष्करी जवानांनी मंगळवारी रात्रीपर्यंत सुटका केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. 

मंगळवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई आणि चुरलमाला येथे ३०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांपैकी ७५ जणांची ओळख पटली असून १२३ जणांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. बचावकार्यात सापडलेले मृतदेह मेपाडी आरोग्य केंद्रात तसेच निलांबूर सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्यात लष्कर, नौदल, ‘एनडीआरएफ’चे जवान सहभागी झाले आहेत. उद्ध्वस्त झालेली घरे, चिखल, राडारोडा यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांची सुटका करताना खराब हवामानामुळे जवानांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वृत्तसंस्था) 

उद्ध्वस्त घरांत करुण दृश्य

उद्ध्वस्त झालेल्या घरांमध्ये अनेकांचे मृतदेह जमिनीवर झोपलेल्या किंवा बसलेल्या अवस्थेत आढळून आले. दरड कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावल्याने अशी स्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत किती लोक बेपत्ता आहेत, याची माहिती वायनाड जिल्हा प्रशासन मिळवत आहे.

आव्हानांवर मात करून मदत

दरडी कोसळल्या तेव्हा त्या परिसरातील गावकरी साखरझोपेत होते. त्याच वेळी मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी देखील या भागात शिरल्याने वायनाडमधील काही गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे त्या ठिकाणी बचावकार्यासाठी जाणे हेदेखील एक आव्हान होते. मात्र, त्यावर मात करून बुधवारीदेखील दुर्घटनाग्रस्तांपर्यंत मदतीचे हात पोहोचले होते.

टॅग्स :wayanad-pcवायनाडlandslidesभूस्खलनAmit Shahअमित शाहKeralaकेरळ