शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

इथे ओशाळली माणुसकी! वायनाडमध्ये भूस्खलनानंतर लोकांनी सोडलं घर; आता होतेय चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 12:07 PM

Wayanad Landslide : भूस्खलनाचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत. मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटना वाढल्या आहेत.

केरळमधील वायनाडमध्ये एकीकडे निसर्गाने कहर केला आहे, तर दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहेत. भूस्खलनाचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत. मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

चोरी होत असल्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. या दुर्घटनेचा फायदा घेऊन चोरटे लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं म्हटलं जात आहे. या परिसरात गस्त वाढवून चोरट्यांना पकडून शिक्षा करावी अशी विनंती लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

एका व्यक्तीने सांगितलं की, आम्ही असे लोक आहोत ज्यांनी या दुर्घटनेत सर्वस्व गमावलं आहे. आमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचं घर सोडलं. मात्र त्यानंतर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्यासाठी परत आलो तेव्हा दरवाजा तुटलेला दिसला. तसेच ते सध्या राहत असलेल्या रिसॉर्टमधील त्याच्या खोलीलाही चोरट्यांनी लक्ष्य करून त्यांचे कपडे चोरल्याची तक्रार त्यांनी केली.

चूरलमाला आणि मुंडक्काईसह आपत्तीग्रस्त भागात पोलीस गस्त घालत असल्याचं अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित भागात किंवा पीडितांच्या घरात रात्री विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बचावकार्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळी पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रभावित भागात किंवा घरांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनानंतर बाधित भागात बचावकार्य सुरू आहे. या अपघातातील मृतांची संख्या ३५० हून अधिक झाली आहे, तर २०६ लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, आयएमडीने वायनाडमध्ये सहा ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत बचावकार्यावर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळtheftचोरीRainपाऊसPoliceपोलिस