शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

Wayanad Landslides : वायनाड भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:39 AM

Wayanad Landslides : केरळमधील वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार जणांना वाचवण्यात यश आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे.

Wayanad Landslides :केरळमधीलवायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमीही झाल्याची माहिती आहे, अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ३ हजार लोकांची सुटका करण्यात आली आहे. मुसळधार पावसात चिखल, खडक आणि झाडांचे मोठे तुकडे यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. 

लष्कराचे जवान चुरलमाला आणि मुंडक्काई दरम्यान कोसळलेल्या पुलाची पुनर्बांधणी करत आहेत. या पुलामुळे बचावकार्य जलद करता येईल. चुरलमळा ते मुंडक्काईला जोडणारा हा १९० फूट पूल आज दुपारपर्यंत पूर्ण होऊ शकतो.

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वायनाडला रवाना झाले आहेत. ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याआधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना जाता आले नाही.

चार गावांना मोठा फटका

वायनाडमध्ये भूस्खलनाने मोठं नुकसान झालं आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री वायनाडमध्ये अतिवृष्टी आपत्ती ठरली. पहाटे १ ते पहाटे ५ च्या दरम्यान तीन वेळा भूस्खलन झाले आणि डोंगराच्या खाली असलेल्या चेलियार नदीच्या पाणलोटात वसलेल्या चुरामाला, अट्टमला, नूलपुझा आणि मुंडक्काई या चार गावांमध्ये विध्वंस झाला. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले. पुराच्या मार्गात जे आले ते वाहून गेले. झाडेही उन्मळून पडली. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी सांगितले की, एनडीआरएफ, लष्कर आणि इतर एजन्सींनी केलेल्या समन्वित आणि मोठ्या प्रमाणात बचाव मोहिमेमुळे वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागातून १,५०० हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली. 

विजयन म्हणाले, "दोन दिवसांच्या बचाव मोहिमेत १,५९२ लोकांची सुटका करण्यात आली. इतक्या कमी वेळेत इतक्या लोकांना वाचवण्याच्या समन्वित आणि व्यापक ऑपरेशनची ही उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात आपत्तीच्या आजूबाजूच्या भागातील ६८ कुटुंबांतील २०६ लोकांना तीन छावण्यांमध्ये हलवण्यात आले, यात ७५ पुरुष, ८८ महिला आणि ४३ लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनानंतर सुरू असलेल्या बचाव कार्यात अडकलेल्या १,३८६ लोकांना वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'यामध्ये ५२८ पुरुष, ५५९ महिला आणि २९९ मुलांचा समावेश आहे, या सर्वांना सात शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे. दोनशे एक जणांना वाचवून रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी ९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :wayanad-pcवायनाडKeralaकेरळmonsoonमोसमी पाऊस