शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 22:24 IST

आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराला अंकुश लावण्यासाठी आम्ही अनेक कामे केली आहेत. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराने देश बर्बाद केला होता. मात्र आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. 

विरोधकांवर हल्ला चढवताना नाव न घेता मोदी म्हणाले, "बेईमान लोकांना शिक्षा होत आहे, तर प्रामाणिक लोकांचा सन्मान केला जात आहे. माझ्यावर आरोप केला जात आहे की, मोदी लोकांना तुरुंगात टाकत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. पण, देशाची संपत्ती चोरीली असेल तर कुठे रहायला हवे? शोधून-शोधून पाठवायला हवे  की नाही? तुम्हाला हवे, तेच काम मी करत आहे. काही लोक मोठ्या चिंतेत आहेत."

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीचाही केला उल्लेख - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या 30 दिवसांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, गरीब तसेच मध्यम वर्गीयांना  सशक्त बनवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, सरकारने कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

2047 वर काय म्हणाले मोदी? -पीएम मोदी म्हणाले, जर आपण ठरवले, तर 2047 पर्यंत भारताला विकसित देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आज आपल्याकडे पाहत आहे. देशाला अशक्य वाटणारी हमी आज मी देऊ शकतो, कारण यामागे तुमची ताकद आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारjailतुरुंगBJPभाजपा